AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी मौन सोडले, पहिल्यांदाच कृषी कायद्यावर सविस्तर बोलले

कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असल्याचं सांगत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमधल्या अडचणी दूर होत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी मौन सोडले, पहिल्यांदाच कृषी कायद्यावर सविस्तर बोलले
| Updated on: Dec 12, 2020 | 3:50 PM
Share

नवी दिल्ली :  मोदी सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केले जावेत, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशातच आज (शनिवार) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांवर आपली सविस्तर भूमिका मांडली. कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असल्याचं सांगत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमधल्या अडचणी दूर होत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (Pm Narendra Modi on Agriculture Law)

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)च्या 93 व्या वार्षिक बैठकीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी नवीन कायदे देशातील शेतकऱ्यांच्या किती फायदेशीर आहेत, याचा पाढा वाचला. कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित संलग्न क्षेत्रात आतापर्यंत आपण फक्त अडचणीच पाहत आलो आहोत मात्र आता असं होणार नाही. आता आपण सगळ्या अडचणी सोडवत चाललो आहोत, असं मोदी म्हणाले.

कृषी कायद्याने शेतकऱ्यांना मिळणार नवा बाजार

“नव्या कृषी सुधारणांनुसार शेतकऱ्यांना नवा बाजार मिळेल. नवे पर्याय देखील शेतकऱ्यांना आजमावून पाहता येतील. तसंच तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होईल”, असं मोदी म्हणाले. “देशाचं कोल्ड स्टोरेज आधुनिक असेल. या सगळ्यांमुळे कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल. या सर्वांचा मोठा फायदा देशातील शेतकऱ्याला होईल”, असंही मोदी म्हणाले.

“नव्या कृषी कायद्यानुसार आज भारतातील शेतकऱ्यांकडे आपली पीके मंडीबरोबरच बाहेरच्या बाजारातही विकण्याचा पर्याय आहे. आज भारतामध्ये मंडीचं आधुनिकीकरण होत आहे. शेतकऱ्यांना आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर पीके विकण्याचा आणि खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला गेला आहे”, असं मोदी म्हणाले.

भारताचं कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वायब्रंट

“कृषी आणि संलग्न क्षेत्रात आज अडचणींच्या भिंती नको तर पुल हवेत जे एकदुसऱ्यांना सपोर्ट करतील. पाठीमागच्या काही वर्षांपासून आपण अनेक अनेक अडचणींवर मात करुन पुढे जात आहोत. त्यामुळे भारताचं कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वायब्रंट होत चाललेलं आहे”, असं मोदी म्हणाले.

(Pm Narendra Modi on Agriculture Law)

संबंधित बातम्या

Delhi Farmer Protest | कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.