मोदींनी मौन सोडले, पहिल्यांदाच कृषी कायद्यावर सविस्तर बोलले

कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असल्याचं सांगत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमधल्या अडचणी दूर होत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी मौन सोडले, पहिल्यांदाच कृषी कायद्यावर सविस्तर बोलले
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 3:50 PM

नवी दिल्ली :  मोदी सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केले जावेत, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशातच आज (शनिवार) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांवर आपली सविस्तर भूमिका मांडली. कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असल्याचं सांगत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमधल्या अडचणी दूर होत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (Pm Narendra Modi on Agriculture Law)

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)च्या 93 व्या वार्षिक बैठकीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी नवीन कायदे देशातील शेतकऱ्यांच्या किती फायदेशीर आहेत, याचा पाढा वाचला. कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित संलग्न क्षेत्रात आतापर्यंत आपण फक्त अडचणीच पाहत आलो आहोत मात्र आता असं होणार नाही. आता आपण सगळ्या अडचणी सोडवत चाललो आहोत, असं मोदी म्हणाले.

कृषी कायद्याने शेतकऱ्यांना मिळणार नवा बाजार

“नव्या कृषी सुधारणांनुसार शेतकऱ्यांना नवा बाजार मिळेल. नवे पर्याय देखील शेतकऱ्यांना आजमावून पाहता येतील. तसंच तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होईल”, असं मोदी म्हणाले. “देशाचं कोल्ड स्टोरेज आधुनिक असेल. या सगळ्यांमुळे कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल. या सर्वांचा मोठा फायदा देशातील शेतकऱ्याला होईल”, असंही मोदी म्हणाले.

“नव्या कृषी कायद्यानुसार आज भारतातील शेतकऱ्यांकडे आपली पीके मंडीबरोबरच बाहेरच्या बाजारातही विकण्याचा पर्याय आहे. आज भारतामध्ये मंडीचं आधुनिकीकरण होत आहे. शेतकऱ्यांना आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर पीके विकण्याचा आणि खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला गेला आहे”, असं मोदी म्हणाले.

भारताचं कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वायब्रंट

“कृषी आणि संलग्न क्षेत्रात आज अडचणींच्या भिंती नको तर पुल हवेत जे एकदुसऱ्यांना सपोर्ट करतील. पाठीमागच्या काही वर्षांपासून आपण अनेक अनेक अडचणींवर मात करुन पुढे जात आहोत. त्यामुळे भारताचं कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वायब्रंट होत चाललेलं आहे”, असं मोदी म्हणाले.

(Pm Narendra Modi on Agriculture Law)

संबंधित बातम्या

Delhi Farmer Protest | कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.