मी बागेश्वर बाबा नाही, पण…; नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना उद्देशून असे का म्हणाले?
पंतप्रधान मोदींनी आयआयटी दिल्लीत दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींनी सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना पुढील भविष्यांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना केल्या. पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात एक जोक देखील सांगितला. त्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना महणाले, ‘तुमच्या मनात काही ना काही चालू असेल. हसत हसत म्हणाले, मी बागेश्वर बाबा नाही. पण काही ना काही चालू असेल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याविषयी वेगवेगळं चित्र असतं. अनेक मित्रांना पहिल्या स्टार्टअपचं स्वप्न असेल. तर काहींना आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असेल. खरंतर प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न वेगळं असतं. यात एक गोष्ट अशी आहे की, सर्वांच्या मनात एकसारखी आहे. तुमचा आयआयटी दिल्लीत पहिला दिवस होता. त्यावेळी आठवण करा. आजच्या दिवसाचं स्मरण करा. तुम्ही विचार करत असालच की, ही कालचीच गोष्ट आहे, ओरिएन्टेशन झालं. आता कन्वोकेशन होतंय. तुम्हाला समाधान होत असेल. तुमच्या जीवनाच्या नव्या अध्यायाचा उत्साह असेल. त्यामुळे आजचा क्षण जगून घ्यावं’.
‘तुमच्यावर येणार्या काळात जबादाऱ्या वाढणार आहेत. तेव्हा येथील जुन्या आठवणी तुम्हाला जुन्या काळात घेऊन जातील. या आठवणी तुम्हाला एनर्जेटिक करतील. प्रत्येक हॉस्टेलच्या आठवणी राहतील. तुम्हाला कुमाऊ, आरा, कारा..बिंडी, नील, कैलास, हिमाद्री, इंटर हॉस्टेल कॉम्पिटेशन किस्से , जुने तंटे अनेकांच्या लक्षात राहतील. तुम्ही पुन्हा त्याचं स्मरण करावे. ही केवळ शिक्षणाची गोष्ट नव्हे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
#WATCH | IIT Delhi’s 57th Convocation Ceremony | Prime Minister Narendra Modi says, “… Somewhere in the back of your minds, something else might be going on. I am not Baba Bageshwar, but surely, thoughts are running through every student’s mind. Each of you likely holds a… pic.twitter.com/9R9ebCb5SP
— ANI (@ANI) August 8, 2026
‘आता वेळ निघायचा झाला आहे. तुम्हाला कँटिनच्या पराठ्याची आठवण होत असेल. तुमच्यापैकी अनेकांना आणखी काही क्षण घालवायचा असेल. या भावुक क्षणी मी एक गोष्ट सांगेल. तुम्ही जीवनात मागे वळून पाहण्याची संधी देईल. तेव्हा कॅम्पस लाइफ, तुमचे मित्र, शिक्षक, मेंटॉर आणि स्टाफ कुटुंब बनलंय. तुमच्या प्रोफेसरने आकार दिलाय. तुमचं कॅम्पस हळूहळू तुमचं घर बनलंय. तुम्ही यशात या सर्वांची आठवण कराल. सर्वांबाबत कृतज्ञ व्हाल. विसरून जाऊ नका, असेही त्यांनी सांगितले.