Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेत प्रियांका गांधी यांचं पहिलं भाषण, भाषणातील 10 महत्त्वाच्या गोष्टी

प्रियांका गांधी वाड्रा यांनी संसदेत आज पहिल्यांदा भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं. संविधानाचे संरक्षण, आर्थिक न्याय आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली.

लोकसभेत प्रियांका गांधी यांचं पहिलं भाषण, भाषणातील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 3:27 PM

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज लोकसभेत पहिल्यांदा भाषण केलं. प्रियांका गांधी यांच्या लोकसभेतील पहिल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. अदानीच्या मुद्द्यांवरुन देखील त्यांनी सरकारला घेरलं. प्रियांका गांधी यांनी म्हटले की, तुम्ही भूतकाळात किती दिवस जगणार आहात. सर्व जबाबदारी नेहरूंची आहे का? तुम्ही नेहमी जुन्याच गोष्टीवर बोलता, तुमच्याबद्दल कधी बोलणार?

प्रियांका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्न देखील उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, उद्योगपतींसाठी शेतीविषयक कायदे केले जात आहेत. देशातील शेतकरी रडत आहे. आपत्ती आल्यानंतर शेतकरी अडचणीत येतात. देशातील शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. पण आज जे कायदे बनवले जात आहेत ते बड्या उद्योगपतींसाठी बनवले जात आहेत.

  • लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी संविधानाबाबत बोलताना म्हटले की, भारतीय राज्यघटना हे आरएसएसचे संविधान नाही. ते केवळ कागदपत्र नाही. न्याय आणि आशेची ती ज्योत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा किंवा पाडण्याचा अधिकार दिला आहे. ही राज्यघटना न्यायाची हमी देते.
  • प्रियांका गांधी म्हणाल्या की, आज जातीय जनगणनेची चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्याने तसा उल्लेख केला. निवडणुकीत जो निकाल आला त्यावर हा उल्लेख करण्यात आला.
  • आजचे राजे वेश बदलतात, पण जनतेत जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. टीका ऐकण्याची त्यांच्यात ताकद नाही. आज देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पण भीती पसरवणारे स्वत: भीतीच्या सावटात जगत आहेत.
  • लोकसभेत जर असा निकाल आला नसता तर भाजपने संविधान बदलले असते. पण देशातील जनताच संविधान सुरक्षित ठेवेल, हे या निवडणुकीत त्यांना कळून चुकले आहे. संविधान बदलण्याची चर्चा या देशात चालणार नाही, याची त्यांना जाणीव झाली.
  • नेहरूंची देशासाठी मोठी भूमिका आहे. जी नाकारता येणार नाही. नेहरूंनी देशात अनेक सार्वजनिक उपक्रम सुरु केले. पण संपूर्ण जबाबदारी काय नेहरूंची आहे का? तुम्ही नेहमी जुन्या गोष्टींबद्दल बोलता, पण तुमच्याबद्दल कधी बोलणार.
  • उद्योगपतींसाठी शेतीविषयक कायदे केले जात आहेत. पण या देशातील वायनाडपासून ललितपूरपर्यंतचा शेतकरी रडत आहेत. शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. पण देशात कायदे उद्योगपतींसाठी केले जात आहेत.
  • अदानी प्रकरणावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारने सर्व कोल्ड स्टोरेज अदानींना दिले. एका व्यक्तीला वाचवण्यासाठी देशातील 142 कोटी जनतेकडे दुर्लक्ष होत आहे. हे देश पाहत आहे. सर्व व्यवसाय, सर्व संसाधने, सर्व संपत्ती, सर्व संधी एकाच व्यक्तीकडे सोपवल्या जात आहेत.
  • आज सरकार अदानीजींच्या नफ्यावर चालत आहे. गरीब तो अधिक गरीब होत आहे. श्रीमंत तो अधिक श्रीमंत होत आहे.
  • तुम्ही महिला सक्षमीकरणाचा कायदा आणला, पण त्याची अंमलबजावणी का होत नाही. आजची स्त्री 10 वर्षे त्याची वाट पाहत बसणार का?
  • सरकार खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.