AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल आणि प्रियंका गांधी कोणत्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार?

Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटपाच्या चर्चा सुरु आहेत. प्रत्येक पक्ष जागांबाबत चाचपणी करत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून गेल्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूल लढवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राहुल आणि प्रियंका गांधी कोणत्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार?
| Updated on: Feb 29, 2024 | 4:59 PM
Share

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अघाडी करण्यासाठी अनेक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहेत. इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर समाजवादी पक्षाला मध्यप्रदेशात 1 जागा मिळाली आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे देखील उत्तर प्रदेशातून निवडणुका लढवत आल्या आहेत. राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना अमेठीत स्मृती इराणी यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता ते कोणत्या जागेवरुन निवडणूक लढवणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

राहुल गांधी कुठून लढणार?

सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. तर प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढवू शकतात. कारण सोनिया गांधी या आता राज्यसभेत निवडून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर पहिल्यांदाच प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. राहुल गांधी येथून १५ वर्षे खासदार होते. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला.

प्रियंका गांधी कुठून लढणार?

सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रायबरेलीच्या जागेवरून प्रियंका गांधी यांना उमेदवारी मिळू शकते. दुसरीकडे, राहुल गांधी अमेठीतून पुन्हा एकदा नशीब आजमवू शकतात. 2019 प्रमाणे स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात टक्कर होऊ शकते.

स्मृती इराणी यांची टीका

नेहरू आणि गांधी कुटुंबावर केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांनी बुधवारी टीका केली होती. त्या म्हणाल्या की, ‘नामदारांनी’ अमेठीला 50 वर्षे विकासापासून वंचित ठेवले. त्यामुळे येथील जनता गरीब राहिली. अमेठीचे लोक जेव्हा दिल्लीत खासदारांना भेटायला जायचे तेव्हा एकतर खासदार परदेशात होते किंवा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना आत जाऊ दिले नाही.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.