Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी ‘आम्हाला राजीनामाच हवा’

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पेपर लीकच्या मुद्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी आम्हाला राजीनामाच हवा
Rahul Gandhi
| Updated on: Jul 24, 2026 | 9:24 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पेपर लीकच्या मुद्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत’ असं राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या व्हिडिओ संदेशावर म्हटलं आहे. “या पथॅटिक अर्ध्यारात्रीच्या व्हिडिओवरुन त्यांच्या इंटेलिजेंसचा अपमान करु नका. प्रधान यांना बर्खास्त करा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्या आणि माफी मागा” अशी मागणी राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन केली आहे.

“पेपर लीक हा काही किरकोळ विषय नाही. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना त्रास झाला. मागच्या अडीच महिन्यात पेपर लीकच्या घटनेनंतर सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. दोषींना अटक करुन तुरुंगात पाठवलं आहे” असं पीएम मोदी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हणाले. “विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही सरकारची जबाबदारी होती. म्हणूनच कमीत कमी वेळेत जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली. 19 तारखेला परीक्षेचे निकाल सुद्धा जाहीर केले” असं पीएम मोदी म्हणाले.

फक्त इतक्या कारवाईने समाधानी होणार नाही

सरकार फक्त इतक्या कारवाईने समाधानी होणार नाही असं पीएम मोदी व्हिडिओमध्ये म्हणाले. त्यांनी संबंधित विभागांना पेपर लीक विषयात फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याचे निर्देश दिले. विभागांनी सतत मेहनत करुन रात्री उशिरा या संबंधीचा मसुदा सोपवला.

उपोषण काल रात्री संपलं

नीट पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरु केलं होतं. 26 दिवसांपासून सुरु असलेलं हे उपोषण काल रात्री संपलं. जेपी नड्डा यांच्या हाताने ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. सरकारकडून काही आश्वासन घेतल्यानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान हिंसाचारही झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us