Rahul Shewale : उद्धव ठाकरेंची मोदींसोबत युतीसाठी तासभर चर्चा, पत्रकार परिषद शिंदेंची पण गौप्यस्फोट राहुल शेवाळेंचे…

माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं उद्धव ठाकरे आम्हाला म्हणाले, अशी माहिती राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या, असे शेवाळे म्हणाले.

Rahul Shewale : उद्धव ठाकरेंची मोदींसोबत युतीसाठी तासभर चर्चा, पत्रकार परिषद शिंदेंची पण गौप्यस्फोट राहुल शेवाळेंचे...
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल शेवाळेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 6:47 PM

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते. याची सविस्तर माहिती देताना राहुल शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले, की 1 जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं पक्षासोबत राहू. पण तेव्हा आम्ही सांगितलं भाजपासोबत निवडणूक लढवली आहे. आम्हाला त्रास होतोय. शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी त्या भूमिकेचं स्वागत करेल, असे ते म्हणाले. त्यावेळी संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोर उद्धव ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले. भाजपाने तो निर्णय घेतला, तर मी स्वागत करेल असे सांगितले. त्याचे आम्ही स्वागत केले, असे शेवाळे म्हणाले.

‘त्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज’

पुढे बोलताना शेवाळे यांनी सांगितले, की पुन्हा बैठका झाल्या. तेव्हा पुढच्या निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला. पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढू म्हणून सांगितलं. आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल, असं आम्ही सांगितलं. तेव्हा मलाही युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करायचा खूप प्रयत्न केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदींना भेटायला आले. तेव्हा या भेटीत मोदींकडे उल्लेख केला. त्यावेळी युतीबाबत मोदींसोबत एक तास चर्चा झाली. जूनमध्ये बैठक झाली. जुलैमध्ये अधिवेशन होतं. त्यावेळी भाजपाच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे भाजपा नेतृत्व नाराज झालं. एकीकडे युतीचं बोलणं होतंय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. त्याबद्दल भाजपe श्रेष्ठीत नाराजी पसरली.

‘रिस्पॉन्स मिळाला नाही’

कित्येक वेळा उद्धव ठाकरेंनी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाल नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असं ते आम्हाला म्हणाले. मी स्वत: चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली नाही. आमच्या चार पाच बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीतही आम्ही युती करायला तयार आहोत. पण मला सहकार्य मिळत नाही. आम्ही सर्व त्यावेळी प्रयत्न करत होतो.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले राहुल शेवाळे?

‘संजय राऊतांच्या महाविकास आघाडीसोबत बैठका’

एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे संजय राऊत हे महाविकास आघाडीसोबत बैठका आणि उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणं सुरू होतं. त्यामुळे आमच्या मनात शंका निर्माण झाल्या. आम्ही युतीचे प्रयत्न करत असताना मार्गारेट अल्वांना पाठिंबा दिला गेला. दोन बैठका झाल्या होत्या. मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी पत्रं दिलं. मार्गारेट अल्वा महाराष्ट्राच्या प्रभारी असताना त्या चार वर्षात त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला.त्यामुळे त्यांना पाठिंबा देणं उचित वाटलं नाही. उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी रिस्पॉन्स आला नाही आणि राऊतांनी महाविकास आघाडीच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, असे राहुल शेवाळे म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.