AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rail Accident : अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी, सुरक्षित इच्छित स्थळी पोहचू का?, याचीच लागली चिंता

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी प्रवाशांना चिंता वाटत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होणारे रेल्वेचे अपघात त्याला कारणीभूत आहे. आपण इच्छित स्थळी सुखरूप पोहचू का, अशी त्यांची चिंता आहे.

Rail Accident : अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी, सुरक्षित इच्छित स्थळी पोहचू का?, याचीच लागली चिंता
Railway Accident Series
| Updated on: Jul 31, 2024 | 4:49 PM
Share

भारतीय रेल्वे (Indian Railways) ही दळणवळणाची सर्वात स्वस्त आणि किफायतशीर साधन आहे. आता पण देशातील जवळपास 98 टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेची अपघात मालिका सुरु आहे. अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी भरली आहे. इच्छित स्थळी सुरक्षित पोहचू का, अशी चिंता प्रवाशांना लागलेली आहे. याविषयी लोकल सर्किल नावाच्या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे.

काय आहे नाराजी

त्यानुसार, प्रत्येक दुसरा प्रवासी हा घाबरलेला आहे. त्यांना आपण इच्छित स्थळी पोहचू की नाही, याची भीती वाटत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. इतकेच नाही तर प्रवासी रेल्वेतील अस्वच्छेतेवरुन पण नाराज आहेत. तर ट्रेनमधील भोजनावर पण अनेक प्रवासी नाखूष असल्याचे या सर्वेमध्ये समोर आले आहे. ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काय म्हणतो हा लोकल सर्किल सर्व्हे?

वेळेवर कधी धावणार रेल्वे?

काही मुख्य ट्रेन आणि महागडे भाडे वसूल करणाऱ्या ट्रेन वगळता इतर सर्व रेल्वे या कधीच वेळेवर धावत नसल्याचा दावा लोकल सर्किल सर्वेत करण्यात आल्याचे वृत्त एनबीटीने दिले आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे या कधीच वेळेत धावत नसल्याचे सर्वेक्षणात प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन हुकते. काहींना दुसरी रेल्वे गाठायची असते. पण या गडबडीमुळे दुसरी रेल्वे सुटून जाते. त्यानंतर पुढील रेल्वेसाठी बराच वेळ वाट पाहत राहावे लागत असल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे.

रेल्वेतील स्वच्छेतेवरुन पण प्रवासी नाराज आहेत. टॉयलेटमधील अस्वच्छता अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. तर ट्रेनमधील भोजनावर पण अनेक प्रवासी नाखूष असल्याचे या सर्वेमध्ये समोर आले आहे. ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा चिंताजनक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

61 हजार प्रवाशांनी मांडले मत

लोकल सर्वेचे संस्थापक सचिन तापाडिया यांनी या सर्वेमध्ये देशातील 378 जिल्ह्यातील जवळपास 61 हजार प्रवाशांचे मत नोंदवले. त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. या प्रवाशांना गत तीन वर्षांतील त्यांच्या प्रवासाविषयी माहिती विचारण्यात आली. या सर्वेनुसार, प्रवास करताना प्रत्येक दोन पैकी एका प्रवाशाला आता सुरक्षेविषयी चिंता होत आहे. तर त्यांची स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाबाबत चिंता आहे.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.