AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rail Accident : अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी, सुरक्षित इच्छित स्थळी पोहचू का?, याचीच लागली चिंता

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरक्षित रेल्वे प्रवासाविषयी प्रवाशांना चिंता वाटत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होणारे रेल्वेचे अपघात त्याला कारणीभूत आहे. आपण इच्छित स्थळी सुखरूप पोहचू का, अशी त्यांची चिंता आहे.

Rail Accident : अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी, सुरक्षित इच्छित स्थळी पोहचू का?, याचीच लागली चिंता
Railway Accident Series
| Updated on: Jul 31, 2024 | 4:49 PM
Share

भारतीय रेल्वे (Indian Railways) ही दळणवळणाची सर्वात स्वस्त आणि किफायतशीर साधन आहे. आता पण देशातील जवळपास 98 टक्के लोक रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेची अपघात मालिका सुरु आहे. अपघात सत्रामुळे रेल्वे प्रवाशांच्या मनात धडकी भरली आहे. इच्छित स्थळी सुरक्षित पोहचू का, अशी चिंता प्रवाशांना लागलेली आहे. याविषयी लोकल सर्किल नावाच्या संस्थेने एक सर्वेक्षण केले आहे.

काय आहे नाराजी

त्यानुसार, प्रत्येक दुसरा प्रवासी हा घाबरलेला आहे. त्यांना आपण इच्छित स्थळी पोहचू की नाही, याची भीती वाटत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. इतकेच नाही तर प्रवासी रेल्वेतील अस्वच्छेतेवरुन पण नाराज आहेत. तर ट्रेनमधील भोजनावर पण अनेक प्रवासी नाखूष असल्याचे या सर्वेमध्ये समोर आले आहे. ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काय म्हणतो हा लोकल सर्किल सर्व्हे?

वेळेवर कधी धावणार रेल्वे?

काही मुख्य ट्रेन आणि महागडे भाडे वसूल करणाऱ्या ट्रेन वगळता इतर सर्व रेल्वे या कधीच वेळेवर धावत नसल्याचा दावा लोकल सर्किल सर्वेत करण्यात आल्याचे वृत्त एनबीटीने दिले आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे या कधीच वेळेत धावत नसल्याचे सर्वेक्षणात प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन हुकते. काहींना दुसरी रेल्वे गाठायची असते. पण या गडबडीमुळे दुसरी रेल्वे सुटून जाते. त्यानंतर पुढील रेल्वेसाठी बराच वेळ वाट पाहत राहावे लागत असल्याचे सर्वेमध्ये म्हटले आहे.

रेल्वेतील स्वच्छेतेवरुन पण प्रवासी नाराज आहेत. टॉयलेटमधील अस्वच्छता अनेकांच्या चिंतेचा विषय आहे. तर ट्रेनमधील भोजनावर पण अनेक प्रवासी नाखूष असल्याचे या सर्वेमध्ये समोर आले आहे. ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा दर्जा चिंताजनक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

61 हजार प्रवाशांनी मांडले मत

लोकल सर्वेचे संस्थापक सचिन तापाडिया यांनी या सर्वेमध्ये देशातील 378 जिल्ह्यातील जवळपास 61 हजार प्रवाशांचे मत नोंदवले. त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या. या प्रवाशांना गत तीन वर्षांतील त्यांच्या प्रवासाविषयी माहिती विचारण्यात आली. या सर्वेनुसार, प्रवास करताना प्रत्येक दोन पैकी एका प्रवाशाला आता सुरक्षेविषयी चिंता होत आहे. तर त्यांची स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जाबाबत चिंता आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.