AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवर काँग्रेसचा आक्षेप, न्यायालयाचा निर्णय चुकीचा, जयराम रमेशांनी भूमिका मांडली…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीत एलटीटीई आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली होती.

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवर काँग्रेसचा आक्षेप, न्यायालयाचा निर्णय चुकीचा, जयराम रमेशांनी भूमिका मांडली...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 11, 2022 | 5:42 PM
Share

नवी दिल्लीः राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 6 दोषींची म्हणजेच नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रन, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि बी. व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने मे महिन्यात सुटका झालेल्या अन्य दोषी ए. जी. पेरारिवलनच्या प्रकरणाचा विचार करून हा आदेश दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर काँग्रेस पक्ष खूश नसून या आदेशावर तीव्र आक्षेप घेत हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा जो काही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तो निर्णय चुकीचा आहे.

त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने टीका केली आहे. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने भारतीयांच्या भावनेचा विचार केला नाही हे दुर्दे सुप्रीम कोर्टाने भारताच्या भावनेने काम केले नाही हे दुर्दैव आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सध्या पॅरोलवर बाहेर असलेल्या नलिनी यांनी तुरुंगातून लवकर सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर नलिनी यांची याचिका दाखल करण्यात आली होती. नलिनी यांनी पेरारिवलनच्या प्रकरणाचा हवाला देत त्यांनी तशी मदत मागितली होती.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीत एलटीटीई आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली होती. या प्रकरणी 7 दोषींना जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती.

त्यानंतर या प्रकरणी 1999 मध्ये सुप्रीम कोर्टाने सातपैकी चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली तर त्यातील तिघांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती.

2000 मध्ये, नलिनीची जाहीर करण्यात आलेली फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलली गेली होती, तर 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलनसह अन्य तीन दोषींची फाशीची शिक्षा ही कायम ठेवली होती.

Follow Us
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान