राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट, चंपत राय, अनिल मिश्रा यांना क्लीनचीट; केवळ 8 जणच…
अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. एसआयटीने आपल्या अंतिम अहवालात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांना क्लीनचीट दिली आहे. या प्रकरणातील 8 जणांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे राय आणि मिश्रा यांच्यावरील आरोपांचे खंडन झाले आहे.

अयोध्येतील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला फायनल रिपोर्ट श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सोपवला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या रिपोर्टमध्ये ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचं नाव नाहीये. त्यामुळे चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना एसआयटीने क्लीनचिट दिल्याचं मानलं जात आहे. तर आठ जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. दोघांनीही दानचोरी प्रकरणात 27 जून रोजी पदांचा राजीनामा दिला होता. आता त्यांना क्लीनचीट मिळाली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटी चोरी प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तीन सदस्यांची एसआयटी समिती स्थापन केली होती. लखनऊ मंडलायुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. 23 जून रोजी या समितीने आपला प्राथमिक रिपोर्ट सादर केला होता. त्या आधारावर 25 जून रोजी श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
कारवाईचा मार्ग मोकळा
एसआयटी रिपोर्टनंतर अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, करुणेश पांडेय, मनीष कुमार यादव, सुभाष श्रीवास्तव, श्रीरामशंकर यादव टिन्नू आणि लवकुश मिश्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. फायनल रिपोर्ट ट्रस्टला देण्यात आल्यानंतर आता या लोकांविरोधात कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राय यांनी आरोप फेटाळले होते
मीडिया रिपोर्ट्स नुसार, एसआयटी चौकशीवेळी चंपत राय यांनी या चोरी प्रकरणात आपला हात नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं होतं. मी स्वत: या चोरीची तक्रार केली होती. त्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली, असं चंपत राय यांनी म्हटलं होतं. या तीन सदस्यीय एसआयटी टीममध्ये किरण एस आणि विशेष सचिव (अर्थ) नील रतन कुणार सदस्य म्हणून सामील आहेत.
आरोपींना आरोप कबूल
दरम्यान, एसआयटी तपासात आरोपींनी दान चोरी केल्याचा आरोप स्वीकारला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करणअयात आलेली आहे. या चोरीच्या घटनेनंतर समितीने दानाच्या पैशाच्या गनतीची वेळ बदलली आहे. आता केवळ एकाच पाळीत म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ ठरवण्यात आला आहे.