घुसखोरांना नागरिकतेपासून दूर ठेवायला हवं, दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, विभाजनाचं दु:ख अजूनही बोचत असल्याची खंत

| Updated on: Oct 15, 2021 | 12:46 PM

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो त्या दिवशी स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबरच आपण आपल्या मनात एक वेदना कायम घर करुन राहिली. ती वेदना अजून नाहीशी झाली आहे. आपला देश विभागला गेला, तो अत्यंत दुःखद इतिहास आहे

घुसखोरांना नागरिकतेपासून दूर ठेवायला हवं, दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, विभाजनाचं दु:ख अजूनही बोचत असल्याची खंत
नागपूरमध्ये संघाचा दसरा मेळावा पार पडला
Follow us on

नागपूर: दसऱ्याच्या ( विजया दशमी 2021) च्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी शुक्रवारी नागपूर मुख्यालयात ‘शस्त्र पूजन’ केलं. यावेळी भागवत यांनी डॉ.केशव बळीराम हेडगेवार आणि माधव सदाशिव गोळवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आपल्या भाषणात, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो त्या दिवशी स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबरच आपण आपल्या मनात एक वेदना कायम घर करुन राहिली. ती वेदना अजून नाहीशी झाली आहे. आपला देश विभागला गेला, तो अत्यंत दुःखद इतिहास आहे, पण त्या इतिहासाचे सत्य समोर यायला हवं, ते माहित असलं पाहिजे. (RSS chief Mohan Bhagwat performs Shastra Pooja on the occasion of Vijaya Dashami in Nagpur)

अखंडता परत आणण्यासाठी इतिहासाची माहिती गरजेची

संघप्रमुख म्हणाले की, फाळणीला कारणीभूत असलेले शत्रुत्व आणि वेगळेपणाची पुनरावृत्ती होऊ नये. पुनरावृत्ती टाळण्यासाठी, आपली हरवलेली अखंडता आणि एकता परत आणण्यासाठी, तो इतिहास सर्वांना माहित असावा. विशेषतः नवीन पिढीला माहित असावा. हरवलेला परत येऊ शकतो, हरवलेला हरवलेल्याला परत मिठी मारू शकतो. ते म्हणाले की, आपल्याला आपला विश्वास, पंथ, जात, भाषा, प्रांत इत्यादी छोट्या ओळखीचा संकुचित अहंकार विसरला पाहिजे.

स्वातंत्र्य एका रात्रीत आले नाही

ते म्हणाले की, हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचे 75 वं वर्ष आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण स्वतंत्र झालो. देशाला पुढे चालवण्यासाठी आपण आपल्या देशाची सूत्रं आपल्या हातात घेतली. स्वातंत्र्य मिळवण्यापासून स्वातंत्र्यापर्यंतच्या आमच्या प्रवासाचा तो प्रारंभ बिंदू होता. हे स्वातंत्र्य आम्हाला एका रात्रीत मिळाले नाही. संघप्रमुख म्हणाले की, भारताच्या परंपरेनुसार, स्वतंत्र भारताचे चित्र काय असावे, देशातील सर्व प्रदेशातून सर्व जातींमधून आलेल्या वीरांनी तपश्चर्या आणि त्यागाचा हिमालय उंचावला आहे.

भारतातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम केलं जातं

मोहन भागवत म्हणाले की, ‘स्वाधीनता’ ते ‘स्वातंत्र्य’ हा आपला प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. जगात असे काही घटक आहेत ज्यांच्यासाठी भारताची प्रगती आणि त्यांना मिळणारा मान-सन्मान हा त्यांच्या स्वार्थासाठी हानिकारक आहे. ते म्हणाले की, जगाने गमावलेला समतोल आणि परस्पर मैत्रीची भावना, हीच भारताला प्रभावी बनवते.भारत प्रभावी होऊ नये म्हणूनच भारताच्या इतिहास, संस्कृती या सर्व लोकांविरुद्ध असत्य निंदा पसरवताना जगाची आणि भारताच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे.

भागवतांकडून लोकसंख्या धोरणाचे समर्थन 

मोहन भागवत म्हणाले की, लोकसंख्या धोरणाचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. पुढे 50 वर्षांपर्यंत विचार केल्यानंतर एक धोरण बनवावे आणि ते धोरण सर्वांवर समानतेने लागू केले जावे. लोकसंख्या असंतुलन ही देश आणि जगात एक समस्या बनत आहे.

मोहन भागवत ड्रग्स बद्दल म्हणाले…

मोहन भागवत यांनी यावेळी ड्रग्ज प्रश्नावर बोट ठेवलं. ते म्हणाले की, देशात विविध प्रकारचे नशा येतात, लोकांमध्ये त्यांच्या सवयी वाढत आहेत. हे व्यसन श्रीमंतांपासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. हे मादक द्रव्य कुठं जात आहे हे आम्हाला माहित आहे. याशिवाय त्यांनी बिटकॉईनबद्दलही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, यावर कुणाचे नियंत्रण आहे, मला माहित नाही. सरकारला यावर नियंत्रण ठेवावं लागेल, पण तेही ते करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आपण आपल्या स्तरावर त्याच्याशी लढण्यासाठी तयार असलं पाहिजे.

संघीय रचना तयार केली, पण लोक संघीय नाहीत

सर संघचालक म्हणाले की, आपली संस्कृती कोणालाही उपरा मानत नाही. तिच्या उदयाने संपूर्ण जगात समानता परसेल. जर हिंदुत्व मजबूत झालं, तर जे लोक भांडण लावण्याचा व्यवसाय करतात त्यांची दुकाने बंद होतील. ते म्हणाले की, अनेक वेळा असे दिसून येते की, एका राज्याचे पोलीस दुसऱ्या राज्याच्या पोलिसांवर गोळीबार करतात. ते म्हणाले की, आम्ही देश चालवण्यासाठी संघीय रचना तयार केली आहे, पण लोक संघीय नाहीत. देशातील सर्व जनता सारखीच आहे. असे मतभेद संपवण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे.

घुसखोरांना नागरिकत्वाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं पाहिजे

ते म्हणाले की, सीमेपलीकडून होणारी अवैध घुसखोरी पूर्णपणे रोखली पाहिजे. या घुसखोरांना राष्ट्रीय नागरिक प्रमाणपत्र तयार करून नागरिकत्वाच्या हक्कांपासून वंचित ठेवलं पाहिजे. ते म्हणाले की, हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू आहे. यासाठी अशा लोकांनी देशातही युती केली आहे. भागवत म्हणाले की, मंदिरांची जमीन विकली गेली. मंदिराची मालमत्ता हडप केली आहे. ज्यांना हिंदू देव -देवतांबद्दल आदर नाही, त्यांच्यासाठी हिंदू मंदिरांची मालमत्ता वापरली जाते. हिंदूंनाही हे कळायला हवं की ही संपत्ती हातातून जाऊ नये.

हेही वाचा:

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी करणार सात नव्या संरक्षण कंपन्यांचं लोकार्पण

“घुसखोरी थांबवा नाहीतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल”, गृहमंत्री अमित शाहांचा पाकिस्तानला इशारा