शिंदेंच्या वकिलाचे दोन सर्वात मोठे युक्तिवाद, निकाल फिरणार? झटका कुणाला? कोर्टात काय घडलं?
Shivsena Symbol Live Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीत शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी दोन महत्त्वाचे युक्तिवाद केले. विधिमंडळ पक्षाच्या संख्येनुसार निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असून, आमदार अपात्रतेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असे ते म्हणाले. या युक्तिवादामुळे निकालाला कलाटणी मिळणार का, आणि कुणाला धक्का बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवेळी आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी दोन मोठे युक्तिवाद केले आहेत. एक म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या संख्येवरून निवडणूक आयोगाने दिलेला निकाल कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न कौल यांनी केला. तर, दुसरं म्हणजे आमदारांच्या अपात्रतेचा आणि या प्रकरणाचा काहीच संबंध नसल्याचा सर्वात मोठा युक्तिवादही त्यांनी केला. कौल यांच्या या दोन युक्तिवादामुळे शिंदे गटाची बाजू वरकरणी मजबूत वाटत असली तरी कोर्ट त्यावर काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कौल यांच्या युक्तिवादामुळे निकाल फिरणार का? अशी चर्चा रंगली असून कुणाला झटका बसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नीजर कौल यांनी आज तिसऱ्या दिवशी कोर्टात युक्तिवादाला सुरुवात केली आहे. शिंदे गटाची बाजू मांडताना निवडणूक आयोगाचा निकाल कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न कौल यांनी केला. आयोग निकाल देताना पूर्णतः विधीमंडळ पक्ष चाचणीवर अवलंबून होतं, त्याला काही कारणं होती. निवडणूक आयोग ही एक महत्वाची संस्था आहे, त्यांना काही अधिकार आहेत आणि ते त्याचा वापर करू शकतात, असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.
उगाच प्रकरण वाढवलं जातंय
आमदारांना मिळालेली मत महत्त्वाची आहेत. सादिक अली प्रकरणात तसं नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या आणि आमच्या आमदारांना मिळालेली मते पाहिल्यावर एक रेकगनेशन ठरू शकते. आमच्याकडे पूर्वी असलेल्या आमदारांची संख्या, त्यांना मिळालेली मते, पुढे निवडून आलेले आमदार, त्यांची मतेही आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच आमदारांच्या अपात्रतेचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नाही. अपात्रता प्रकरणावर सुनावणी म्हणजे विनाकारण हे मॅटर वाढवल्यासारख आहे. यात उगाच वेळ वाया घातला जातोय असं दिसतं, असा युक्तिवाद कौल यांनी केला.
मते अपात्र होत नाहीत
एखादा आमदार अपात्र झाला तरी त्याला मिळालेली मते अपात्र होत नाहीत. या गोष्टीकडे आपण लक्ष दिल पाहिजे. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळ राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष यांना वेगळ कस करता येईल? असा सवाल त्यांनी कोर्टाला केला.