Special Report : NRC-CAA च्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये विधानसभा निवडणूक, कुणाचं पारडं जड?; वाचा स्पेशल रिपोर्ट

आसाममध्ये या निवडणुकीत कुणाचं पारडं जड आहे आणि कोण सत्तेतील सर्वात मोठा दावेदार आहे याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

Special Report : NRC-CAA च्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये विधानसभा निवडणूक, कुणाचं पारडं जड?; वाचा स्पेशल रिपोर्ट
BJP Congress Logo
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:56 PM

नवी दिल्ली : आसाममधील विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजलाय. आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी ही निवडणूक होईल. तर 2 मे रोजी निकाल घोषित होईल. सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचं सरकार असलेल्या आसाममध्ये या निवडणुकीत कुणाचं पारडं जड आहे आणि कोण सत्तेतील सर्वात मोठा दावेदार आहे याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. त्यासाठी आसाममधील राजकीय आखाड्याचा आह स्पेशल आढावा (Special report on Assam Assembly election 2021 political analysis)

सध्या आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सत्तेत आहे. 2016 मध्ये झालेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. भाजप 60 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. आसाममध्ये बहुमतासाठी 64 आमदारांची गरज होती. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने एकूण 86 जागा जिंकल्या. यासह आसाममध्ये 2016 मध्ये एनडीएचं सरकार स्थापन झालं. एका अपक्ष आमदारानेही एनडीएच्या सरकारला पाठिंबा दिला. या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होत सत्तेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या 78 वरुन थेट 26 वर आली. भाजपने 26 वरुन 86 वर मजल मारली.

पक्षीय बलाबल

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) – 86 आमदार

भाजप – 60 आमदार आसाम गण परिषद – 14 आमदार बोडोलँड पिपल्स फ्रंट – 12 आमदार रभा जातीय ऐक्य मंच – 00 तिवा जातीय ऐक्य मंच – 00

संयुक्त पुरोगामी आघाडी

काँग्रसे – 26 युनायटेड पिपल्स पार्डी (लिबरल) – 00

ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट – 13 आमदार अपक्ष – 01

राजकीय समीकरणे

आसाममध्ये 2016 च्या निडणुकीत एकूण 4 गटांमध्ये निवडणूक झाली होती. यात भाजपच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी तयार झाली. यात आसाम गण परिषद, बोडोलँड पिपल्स फ्रंट, रभा जातीय ऐक्य मंच आणि तिवा जातीय ऐक्य मंचाचा समावेश होता. संयुक्त पुरोगामी आघाडीत काँग्रसे आणि युनायटेड पिपल्स पार्डी (लिबरल) यांचा समावेश होता. डाव्या पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी देखील युती केली होती. याशिवाय आणखी एक ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या नेतृत्वातही एक आघाडी निवडणूक मैदानात होती.

आसामची 3 कोटी 11 लाख 69 हजार 272 इतकी आहे. यात मतदारांची संख्या जवळपास 2 कोटी होती. मागील निवडणुकीत 84.72 टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच 1 कोटी 69 लाख 19 हजार 364 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आसाममध्ये 1000 पुरुषांमागे 958 स्त्रीयांची संख्या आहे.

आसाममधील विधानसभा निवडणुकीचा इतिहास

आसामच्या आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात 11 पंचवार्षिक म्हणजेच तब्बल 55 वर्षे काँग्रेस सत्तेत होती. मधल्या काळात दोनदा आसाम गण परिषदेनेही सत्ता स्थापन केली. भाजप 2016 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच आसाममध्ये सत्तेवर आलाय. त्याआधी तब्बल 15 वर्षे काँग्रेसचं राज्य होतं.

जातीय समीकरणे

2011 च्या जनगणननेनुसार आसाममध्ये 61.5 टक्के हिंदू, 34.22 मुस्लीम, 3.7 टक्के ख्रिश्चन नागरिक आहेत. अनुसुचित जमातीच्या संख्या जवळपास 13 टक्के आहे. यात प्रामुख्याने बोडो आदिवासी समाजाचा समावेश आहे.

या निवडणुकीतील वादाचा मुद्दा :

केंद्रातील मोदी सरकारने रेटलेल्या NRC आणि CAA कायद्यावरुन आसाममध्ये मोठा गदारोळ झाला होता. अनेक नागरिकांची नावं NRC मध्ये न आल्याने या गटात जोरदार असंतोष पाहायला मिळालाय. याशिवाय आसाममधील पारंपारिक आदिवासी समुहांनी शेजारी देशांमधील नागरिकांना आसाममध्ये नागरिकत्व देण्यास विरोध केलाय. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत नागरिकत्व कायद्याचा मुद्दा किती परिणाम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा बिगूल आज वाजणार; निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता

Assembly Election 2021 Date EC LIVE : 5 राज्यात विधानसभेच्या 824 जागांवर मतदान

Assam Assembly Election 2021 date : आसाम विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदान आणि निकाल कधी?

व्हिडीओ पाहा :

Special report on Assam Assembly election 2021 political analysis

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.