
देशात पुन्हा एकदा चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्पाप जीवांचे बळी गेले आहेत.ताजी घटना तामिळनाडू येथील करुर येथे तमिलगा वेत्री कझगम (TVK) पक्षाचे प्रमुख अभिनेते विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याने ३९ जणांचे बळी गेले आहेत. यात नेहमी प्रमाण महिला आणि लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यात पुन्हा एकदा मोठे अपयश आल्याचे पहायला मिळत आहे. साल २०२५ हे संकटाचे वर्षे ठरले आहे. याच साल २०२५ कुंभमेळा, मंदिर, धार्मिक कार्यक्रम, रेल्वे स्थानक, क्रिकेट टीमचा जल्लोष यात गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन अनेकांचे बळी गेले आहेत. श्रद्धा आणि उत्साहाच्या या क्षणानंतर या घटनांमध्ये लागलीच येथे मातम सुरु झाले. आतापर्यंत गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊन साल २००३ पासून १५०० जणांचे बळी गेले आहेत. जल्लोषाच्या जागी मातम IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (RCB) चा विजयाचा जश्न सुरु असताना ५ जून २०२५ रोजी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर जमलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेली....