AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिजाब वादाचं प्रकरण खंडपीठाकडे जाण्याआधी दोन्ही न्यायाधीशांमध्ये काय घडलं?

हिजाब वाद प्रकरणी आज निर्णय येणं अपेक्षित होतं, पण घडलं वेगळंच! सुप्रीम कोर्टाने प्रकरण खंडपीठाकडे का सोपवलं?

हिजाब वादाचं प्रकरण खंडपीठाकडे जाण्याआधी दोन्ही न्यायाधीशांमध्ये काय घडलं?
नेमकं कोर्टात काय घडलं?Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Oct 13, 2022 | 11:10 AM
Share

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : हिजाब वादप्रकरणी (Hijab Row) सुप्रीम कोर्टातून (Supreme Court) महत्त्वाची घडामोड समोर आली. हिंजाब वादाचं प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या तीन सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आता सुनावणीसाठी येणार आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High court) दिलेला हिजाब बंदीचा निर्णय योग्य की अयोग्य याचा आज निर्णय होण्याची शक्यता होता. मात्र हा निर्णय आता लांबला आहे. दरम्यान, हे प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करण्यासाठी ज्या दोन न्यायाधीशांकडे हे प्रकरण होतं, त्यांनी दोन वेगवेगळी मतं मांडली. दोन्ही न्यायाधीशांच्या मतांमध्ये साम्य नसल्यामुळे अखेर हे प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं.

न्यायमूर्तींनी काय म्हटलं?

न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्यासमोर हिजाब वाद प्रकरणाची सुनावणी होती. यातील न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक हायकोर्टाने घातलेली हिजाब बंदी उठवायला हवी, असं मत मांडलं. तर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक हायकोर्टाने घेतलेला हिजाबबंदीचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं.

दोन्ही न्यायमूर्तींच्या समोर आलेल्या मतांनंतर अखेर हे प्रकरण घटनापीठाकडे देणं गरजेचं असल्याचं समोर आलं. त्यानंतर तीन सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आता सुप्रीम कोर्टात हिजाबबंदीच्या वादावर युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर याबाबतचा निर्णय होईल. त्यामुळे नेमका आता याबाबतचा निर्णय यायला वेळ लागू शकतो, असा अंदाज जाणाकारांनी वर्तवलाय.

प्रकरण काय?

22 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद संपला होता. कर्नाटक सरकारने दिलेल्या हिजाब बंदीच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं. त्यावर 22 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय 13 ऑक्टोबरला देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानुसार आज याबाबतची मोठी अपडेट समोर आली.

कर्नाटकातील उडुपी येथून हिजाब वादाची सुरुवात झाली होती. एका सरकारी कॉलेजात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थीनीला रोखण्यात आलं होतं. ही विद्यार्थीनी गणवेश घालून न आल्यानं येता हिजाब घालून का आली, यावरुन वाद झाला होता.

त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रातही उमटले होते. हे सगळं प्रकरण अखेर कर्नाटक हायकोर्टात गेलं होतं. हायकोर्टाने तीन महत्त्वाच्या गोष्टी निकाला स्पष्ट केल्या होत्या.

शैक्षणिक संस्थेत गणवेश घालावाच लागेल, शैक्षणिक संस्थांना आपला गणवेश काय असावा, हे ठरवण्याचा अधिकार आहे, असं कर्नाटक हायकोर्टाने स्पष्ट केलं होतं. शिवाय हिजाब वादाशी संबंधित अन्य 8 याचिकाही कर्नाटक हायकोर्टाने फेटाळून लावल्या होत्या.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...