AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची प्रथमच घटनापीठासमोर सुनावणी होणार? शिंदे गटाच्या वकिलांची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वरिष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार सुप्रीम कोर्टानं याबाबत सुनावणी घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची प्रथमच घटनापीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची प्रथमच घटनापीठासमोर सुनावणी होणार? शिंदे गटाच्या वकिलांची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी
Image Credit source: tv9 marathi
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 06, 2022 | 11:41 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा फैसला लवकरच होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर बुधवारी (7 सप्टेंबर) रोजी सुनावणी होणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठ स्थापित केले आहे. 5 सदस्यीय खंडपीठापुढे उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

जस्टिस चंद्रचूड़, एमआर शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, नरसिम्मन यांचा या पाच सदस्यीय खंडपीठाचत समावेश आहे. उदय लळीत स्वतः घटनापीठात नसणार आहेत. कारण ते दोन महिन्यानंतर ते निवृत्त होत आहेत. एडी एम चंद्रचूड आणि हिमा कोहली यांनी आधी या प्रकरणात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना या प्रकरणाची माहिती असल्यानं या दोघांचा घटनापीठात समावेश करण्यात आला आहे. कृष्ण मुरारी यांना देखील एका सुनावणीवेळी काम पाहिल होतं. एम आर शाह आणि नसिंमा या दोन न्यायमूर्तींचाही यात समावेश आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवेळी असलेल्या तीन न्यायमूर्तींचा घटनापीठात समावेश आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वरिष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानुसार सुप्रीम कोर्टानं याबाबत सुनावणी घेण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यातील सत्ता संघर्षाबाबात सर्वोच्च न्यायालयात पाच पेक्षा अधिक याचिका दाखल झाल्या आहेत. शिंदे गटाने सर्वात प्रथम याचिका दाखल केली होती. शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. या प्रकरणी शिंदे गट आणि शिवसेनेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता. यावेळी कोर्टाने हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे असं सांगून हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आता हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यात आले. यावर पहिली सुनावणी उद्या होणार आहे.

याआधी 3 वेळा सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या याचिकेवर कोर्ट निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि शिंदे गटाचा सामना असेल. शिवसेना नेमकी कोणाची ?, यासंदर्भात दोन्ही बाजूकडून कागदपत्रं सादर झालीत..त्यामुळं कोर्टाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगही सुनावणी घेणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत
विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर...
Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?
रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला
Raigad Heavy Rain | रायगडमध्ये पावसाचे रौद्ररुप; पर्यायी रस्ता वाहून गेल्याने संपर्क तुटला