AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीव पेक्षा ही सुंदर आहे भारतातील हे ठिकाण, पाहा कुठे वसले आहे हे बेट

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे मालदीवलाच मोठा फटका बसला आहे. मालदीवकडे आता भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मालदीवनंतर आता भारतातील पर्यटन स्थळांना विकसित करण्यासाठी सरकारने देखील सुरुवात केली आहे. मालदीव सारखेच आपल्या देशात एक ठिकाण आहे. ज्याला तुम्ही भेट देऊ शकतात.

मालदीव पेक्षा ही सुंदर आहे भारतातील हे ठिकाण, पाहा कुठे वसले आहे हे बेट
| Updated on: Feb 26, 2024 | 4:53 PM
Share

Indian tourist Place : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहे. पण याचा सर्वाधिक फटका हा मालदीवलाच बसला आहे. भारतातून सर्वाधिक पर्यटक हे मालदीवला जात होते. पण आता याबाबतीत भारतीयांची संख्या पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्यांची मंत्रीपदावरुन हक्कालपट्टी करणार आली होती. पण भारताने यानंतर बायकॉट मालदीव अशी मोहिमच सुरु केली होती. मालदीव हे जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण भारतात मालदीवपेक्षाही सुंदर ठिकाण आहे.

१०० बेटांचे पर्यटन स्थळ

राजस्थानमधील बांसवाडा शहरात एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या शहरात सुमारे 100 बेट आहेत. त्यामुळे या शहराला बेटांचे शहर असेही म्हणतात. माही नदीच्या आत ही लहान बेटे आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटात देखील पाण्याने वेढलेली ही सुंदर नैसर्गिक बेट आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. माही नदी आणि ही बेटे एकत्र पाहिल्यावर एक अप्रतिम नजारा दिसतो. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. त्यावेळी येथे ढग असतात त्यामुळे ते एखाद्या हिल स्टेशनसारखे दिसतात.

पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र

हे ठिकाण पाहिल्यास मालदीवमध्ये आल्यासारखे वाटेल. पाण्याच्या आत असलेली छोटी बेटे इतकी सुंदर दिसत आहेत की इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. बांसवाडा हे राजस्थानच्या दक्षिण भागात वसले आहे. ४० किलोमीटर परिसरात वसलेल्या या शहराचे सौंदर्य येथे वाहणाऱ्या माही नदीने आणखीनच वाढवले ​​आहे. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर एका दिवसात तुम्ही इथे सहज पोहोचू शकता.

हे पर्यटन स्थळ विकसित करणार सरकार

तुम्ही या ठिकाणी बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक प्रकारचे वन्य प्राणी येथे पाहायला मिळतील. हे ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत असे वाटणारच नाही. अनेकांना अजून या ठिकाणाची माहिती नाही. त्यामुळे येथे फारशी गर्दी होत नाहीय मात्र राजस्थान सरकार आता हे ठिकाण नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत....
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून ठिकठिकाणी ध्वजारोहण करत.....
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण
एअरबॅगमुळे भाजप खासदार सावरांचा थोडक्यात जीव वाचला, घोडबंदर रोडवर भीषण.
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?
नंदनवनवर भेट, राजकारणात खळबळ, परांजपे शिंदे गटाच्या वाटेवर?.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन.