AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालदीव पेक्षा ही सुंदर आहे भारतातील हे ठिकाण, पाहा कुठे वसले आहे हे बेट

भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे मालदीवलाच मोठा फटका बसला आहे. मालदीवकडे आता भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मालदीवनंतर आता भारतातील पर्यटन स्थळांना विकसित करण्यासाठी सरकारने देखील सुरुवात केली आहे. मालदीव सारखेच आपल्या देशात एक ठिकाण आहे. ज्याला तुम्ही भेट देऊ शकतात.

मालदीव पेक्षा ही सुंदर आहे भारतातील हे ठिकाण, पाहा कुठे वसले आहे हे बेट
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 26, 2024 | 4:53 PM
Share

Indian tourist Place : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहे. पण याचा सर्वाधिक फटका हा मालदीवलाच बसला आहे. भारतातून सर्वाधिक पर्यटक हे मालदीवला जात होते. पण आता याबाबतीत भारतीयांची संख्या पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचं आवाहन केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी त्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्यांची मंत्रीपदावरुन हक्कालपट्टी करणार आली होती. पण भारताने यानंतर बायकॉट मालदीव अशी मोहिमच सुरु केली होती. मालदीव हे जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पण भारतात मालदीवपेक्षाही सुंदर ठिकाण आहे.

१०० बेटांचे पर्यटन स्थळ

राजस्थानमधील बांसवाडा शहरात एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या शहरात सुमारे 100 बेट आहेत. त्यामुळे या शहराला बेटांचे शहर असेही म्हणतात. माही नदीच्या आत ही लहान बेटे आहेत. राजस्थानसारख्या वाळवंटात देखील पाण्याने वेढलेली ही सुंदर नैसर्गिक बेट आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. माही नदी आणि ही बेटे एकत्र पाहिल्यावर एक अप्रतिम नजारा दिसतो. पावसाळ्यात हे ठिकाण अधिक सुंदर दिसते. त्यावेळी येथे ढग असतात त्यामुळे ते एखाद्या हिल स्टेशनसारखे दिसतात.

पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र

हे ठिकाण पाहिल्यास मालदीवमध्ये आल्यासारखे वाटेल. पाण्याच्या आत असलेली छोटी बेटे इतकी सुंदर दिसत आहेत की इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. बांसवाडा हे राजस्थानच्या दक्षिण भागात वसले आहे. ४० किलोमीटर परिसरात वसलेल्या या शहराचे सौंदर्य येथे वाहणाऱ्या माही नदीने आणखीनच वाढवले ​​आहे. तुम्ही दिल्लीत राहत असाल तर एका दिवसात तुम्ही इथे सहज पोहोचू शकता.

हे पर्यटन स्थळ विकसित करणार सरकार

तुम्ही या ठिकाणी बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक प्रकारचे वन्य प्राणी येथे पाहायला मिळतील. हे ठिकाण पाहिल्यानंतर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत असे वाटणारच नाही. अनेकांना अजून या ठिकाणाची माहिती नाही. त्यामुळे येथे फारशी गर्दी होत नाहीय मात्र राजस्थान सरकार आता हे ठिकाण नवीन पर्यटन स्थळ म्हणून विकसित करत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!