AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा त्यांच्याच देशातून झटका, भारताबाबतचा खोटारडेपणा उघड

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडत असताना मालदीवमधील विरोधी पक्षाच्या नेत्याच राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांचा खोटारडेपणा उघड केला आहे. मुइज्जू हे खोटा दावा करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पाहा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतीय सैनिकांबाबत काय केला होता खोटा दावा.

India maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा त्यांच्याच देशातून झटका, भारताबाबतचा खोटारडेपणा उघड
| Updated on: Feb 26, 2024 | 3:21 PM
Share

India maldive row : मालदीव आणि भारत या दोन देशांमधील तणाव वाढत असताना आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत. मालदीव आणि भारत यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून चांगले संबंध राहिले आहेत. भारताने नेहमीच छोट्या देशांना मदत केली आहे. ज्यामध्ये मालदीवचा देखील समावेश आहे. पण आता मालदीवमध्ये नवीन सरकार आल्याने त्यांनी भारतासोबतचे संबंध बिघडवले आहे. कारण सत्तेत आलेले मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. त्यामुळेच ते भारतापेक्षा चीनला अधिक महत्त्व देत आहेत. त्यातच आता मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी मुइज्जू सरकारचे आणखी एक खोटे उघड केले आहेत. मालदीवमध्ये हजारो भारतीय सैनिक असल्याचा राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांचा दावा त्यांनी खोडून काढला आहे.

शाहीद अब्दुला यांचं ट्विट

शाहीद म्हणाले की, देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक तैनात नाहीत. मुइज्जूच्या हे खोटे बोलत आहेत. मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी सोशल मीडिया साइट X (ट्विटर) वर ही पोस्ट शेअर केली आहे. मुइज्जू सरकारने मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैन्याच्या संख्येबाबत खोटा दावा केला आहे.

मालदीवच्या नेत्याने लिहिले की, ‘राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी केलेला ‘हजारो भारतीय सैनिकांच्या उपस्थितीबाबतचा’ दावा खोटा आहे. भारतीय सैनिकांची नेमकी संख्या सांगण्यास मुइज्जू सरकार अस्पष्टपणे बोलत आहेत. देशात एकही सशस्त्र परदेशी सैनिक नाही. पारदर्शकता महत्त्वाची आहे असून सत्य बाहेर आले पाहिजे.’

चीन समर्थक आहेत मुइज्जू

मोहम्मद मुइज्जू हे नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले. निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांच्या माघारीचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्तेवर आल्यास भारतीय सैनिकांना परत पाठवू असे त्यांनी म्हटले होते. पण हे भारतीय सैनिक त्यांच्याच मदतीसाठी तेथे तैनात आहेत हे मुइज्जू विसरले असावेत.

राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी भारत सरकारला देशातून आपले सैन्य मागे घेण्याची औपचारिक विनंती केली. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत भारत सरकारसोबत करार झाला असल्याची घोषणा केली होती. आता ते म्हणाले की, भारतीय सैनिक लवकरच भारतात परतणार आहेत.

Follow Us
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.