AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुका जिंकण्यासाठी भारताविरोधात नवी चाल

Maldives president new move : मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी आपल्याच देशात खोटा प्रचार सुरु केला आहे. भारताविरोधात त्यांनी आता आणखी एक भूमिका घेतली आहे. ज्यातून त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. भारतीय जवानांना भारतात माघारी बोलवण्याचा निर्णय आधीच झाला असला तरी त्याचं ते गैरफायदा घेताना दिसत आहेत.

India-maldive row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणुका जिंकण्यासाठी भारताविरोधात नवी चाल
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 20, 2024 | 7:09 PM
Share

India -maldive row : भारत आणि मालदीव यांच्यात तणाव वाढलेला असताना भारताने देखील आतापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. चीनकडून समर्थन मिळत असल्याने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. त्यांनी मालदीवमध्ये उपस्थित असलेले भारतीय जवानांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्या आहेत. पण असं असलं तरी हे वाटते तितके सोपे नाहीये. मुइज्जू यांनी म्हटले आहे की, देशातून 80 भारतीय सैनिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय हा संसदेतील बहुमतावर अवलंबून आहे. पुढील महिन्यात संसदेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय सैनिकांना परत पाठवायचे असेल, तर लोकांना विचारपूर्वक मतदान करावे लागेल. असं देखील ते म्हणाले आहेत.

चीन समर्थक मानले जाणारे मुइज्जू यांनी गेल्या वर्षीच्या निवडणूक प्रचारात याच मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या पक्षाला संसदेत बहुमत नाही. त्यामुळे त्यांना हा मुद्दा पुन्हा पुढे आणत निवडणुका जिंकायच्या आहेत. दोन्ही देशांदरम्यान करार झाला आहे की भारतीय सैनिक 10 मे पर्यंत त्यांच्या देशात परत येतील आणि मालदीवचे रेस्क्यू युनिट भारतीय तांत्रिक कर्मचारी चालवतील.

17 मार्च रोजी संसदीय निवडणुका

मुइज्जू म्हणाले की, मालदीव सरकार संसदेत बहुमताशिवाय भारतीय सैनिकांना परत पाठवू शकत नाही. त्यासाठी पुढील निवडणुकीत बहुमत मिळवावे लागेल. हे सैनिक शोध आणि बचाव कार्यात आपल्या सैनिकांना मदत करतात. दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याबाबत करार केला आहे. परंतु, मजलिसमध्ये (संसदेत) बहुमत मिळाल्यावरच आम्ही अंतिम निर्णय घेऊ शकू.

आम्ही सैन्य मागे घेण्याच्या मुद्द्यावर भारतासोबत लेटर ऑफ एक्सचेंजवर स्वाक्षरी केली आहे. हे काम 10 मे पर्यंत पूर्ण करायचे आहे. भारतानेही या मुद्द्यावर आम्हाला आश्वासन दिले आहे. परंतु, तरीही सत्य हेच आहे की 17 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकांच्या निकालांवर सर्व काही अवलंबून आहे आणि लोकांनी मतदान करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

मालदीवच्या वृत्तपत्राचा दावा

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या मालदीवच्या वृत्तपत्रात भारतीय सैन्याच्या माघारीच्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्षांचे विधान खरे नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, जेव्हा भारतीय सैनिक मालदीवमध्ये आले होते तेव्हाही त्यात संसदेची भूमिका नव्हती आणि हा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. आता भारतीय सैनिकांच्या माघारीचीही तीच स्थिती आहे. मुइज्जूने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यात संसदेची भूमिका नाही. याबाबत अध्यक्ष चुकीची माहिती देत ​​आहेत.

मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की भारतीय सैनिकांची पहिली तुकडी 10 मार्चपर्यंत देशात परत येईल. भारत आणि मालदीव यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी एक कोर ग्रुप तयार केला होता.

भारतीय हेलिकॉप्टर आणि विमाने तेथील लोकांना मानवतावादी मदत आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मदत करत राहतील अशी व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न भारताने केला आहे.

मालदीवमध्ये असलेले 80 भारतीय सैनिक दोन हेलिकॉप्टर आणि एका विमानाचे ऑपरेशन हाताळतात. जे सहसा ते बचाव किंवा सरकारी कामांमध्ये वापरले जातात. मुइझू नोव्हेंबर 2023 मध्ये राष्ट्राध्यक्ष झाले आणि तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव आहे.

Follow Us
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?
भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...
Bhiwandi | भिवंडीत गॅस पाईपलाईनला गळती; जेसीबीच्या धक्का लागताच...अनर्थ टाळण्यासाठी मोठी तारांबळ!
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत
पाढरी पट्टी प्रकरणात मोठी अपडेट! 'आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाहीत म्हणून देशपांडेंनी...' जैनी मुंनींचा थेट इशारा
विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन....
VIRAL VIDEO: विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
बसू द्या 8-10 दिवस, CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर...
बसू द्या 8-10 दिवस,  CCTV लावा अन्... रोहित पवारांच्या अन्नत्यागावर लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, म्हणाले, शेतकऱ्यांना...
एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची...
Monsoon Update | एल निनोचा मान्सूनवर मोठा घाव! महाराष्ट्रात पावसाला ब्रेक, बळीराजाची चिंता वाढली
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं...
अनेक विवाह, 17 तोळे सोनं अन्... लग्नाच्या महिन्याभरातच विवाहितेचं भयंकर कांड ! असं फुटलं बिंग