ममतांच्या राजकारणाला आता काँग्रेसचा आधार? पुन्हा पक्ष उभा करणं कठीण? 58 आमदार 20 खासदारांनी बंड का केलं?
बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे ५८ आमदार फुटले असून आता २० खासदार बंड करत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ममता दिदींचे आता पुढचे पाऊल काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत सत्ता स्थापन केली आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाची चिन्हे दिसत होती. अखेर पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा कमळ खुलंले आहे. त्यानंतर टीएमसीच्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीचे ५८ आमदार फुटले आणि आता २० खासदार बंड करत असल्याचा दावा केला जात आहे. ममता बनर्जी यांच्याकडे आता फक्त २२ आमदार आणि ८ खासदारांचे समर्थन शिल्लक आहे. खासदारांपासून पक्ष नेत्यांवर हल्ले होत आहेत. याच दरम्यान ममता दोन दिवस सतत सोनिया गांधी यांना भेटल्या. INDIA ब्लॉकची नेतृत्व करण्याची इच्छाही व्यक्त केली. असेही बोलले जात आहे की, ममता ‘आपली टीएमसी’ काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात. ममता यांच्याकडे आता हेच एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे का? टीएमसीच्या बंडखोर खासदारांमुळे भाजपला काय फायदा होईल? आणि ममता यांची राजकीय पुनरागमन शक्य आहे का? जाणून घेऊया आजच्या एक्सप्लेनरमध्ये… ...