‘तृणमूल’मध्ये परतताच मुकूल रॉय केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणाले, तुमची सुरक्षाव्यवस्था परत घ्या

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुकूल रॉय यांची तृणमूल काँग्रेसमधील घरवापसी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. | Mukul Roy

'तृणमूल'मध्ये परतताच मुकूल रॉय केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणाले, तुमची सुरक्षाव्यवस्था परत घ्या
मुकूल रॉय
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 4:07 PM

कोलकाता: भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या मुकूल रॉय यांनी आता केंद्र सरकारला त्यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा परत घेण्यास सांगितले आहे. यासंदर्भात मुकूल रॉय (Mukul Roy) यांनी केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था परत घ्यावी, असे म्हटले आहे. मुकूल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ही सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, अमित शाह यांच्या अखत्यारित असणाऱ्या केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप या पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही. (TMC leader Mukul Roy writes to the Ministry of Home Affairs for withdrawal of his Central security cover)

मुकूल रॉय यांनी चार वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर मुकूल रॉय आणि त्यांचे पूत्र शुभ्रांशु रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली . मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुकूल रॉय यांची तृणमूल काँग्रेसमधील घरवापसी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

‘घर का लडका घर वापस आया’

मुकूल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली. यावेळी ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. रॉय यांच्या पक्ष प्रवेशानंतर माजी मंत्री राजीव बॅनर्जी आणि माजी आमदार सव्यसाची दत्ताही लवकरच टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

भाजपमध्ये मान नव्हता

मुकूल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017मध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर टीएमसीतील अनेक आमदार आणि मंत्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर मुकुल रॉय यांना पाहिजे तसा मानसन्मान दिला गेला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका अत्यंत नगण्य होती. मिथुन चक्रवर्ती आणि सुवेंदू अधिकारी यांच्या भोवतीच पक्ष फिरत होता. त्यामुळे रॉय अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं

संबंधित बातम्या:

West Bengal: ममतादीदींचा पुन्हा ‘खेला’, मुकुल रॉय यांची घरवापसी?; भाजपला मोठा झटका

West Bengal: बंगालमधील हिंसाचारानंतर भाजपच्या सर्व 77 आमदारांना केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा

‘घर का लडका घर वापस आया’; मुकुल रॉय यांच्या टीएमसी प्रवेशानंतर ममतादीदींचं विधान

(TMC leader Mukul Roy writes to the Ministry of Home Affairs for withdrawal of his Central security cover)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.