मुंबई : आग्रा येथील सामूहिक आत्महत्येच्या घटनेने समाजमन सुन्न झाले. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. रोज वृत्तपत्रात आत्महत्येच्या बातम्या येतात. शेकडो जागरूक नागरिक, तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि धोरणकर्ते ही प्रक्रिया कशी थांबेल या विषयावर उपाय शोधण्यात गुंतले आहेत. मध्य प्रदेश मेडिकल सेल समितीचे सदस्य डॉ. सत्यकांत त्रिवेदी आपल्या राज्यासाठी आत्महत्या प्रतिबंधक धोरणावर (suicide prevention policy) काम करत आहेत. यासाठी ते जवळपास सात वर्षांपासून ‘Say Yes To Life’ (से येस टू लाइफ) अभियान राबवत आहेत. विविध कारणांमुळे होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी (To prevent suicide) देशाला आत्महत्या प्रतिबंधक धोरणाची गरज आहे. या धोरणात्मक नियोजनातून देशभरात मोठ्या गटाला नकारात्मक पावले उचलण्यापासून आपण रोखू शकतो असे त्यांचे मत आहे. वर्ष-2015 च्या संशोधनानूसार, देशातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 30 कोटी लोकांनी आपले जीवन संपवण्याचा विचार केला, तर 2.5 कोटी लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. समाजाचा हा दृष्टिकोन बदलेल (Attitudes will change) असे आत्महत्या प्रतिबंधक धोरण देशात तयार केले, तर हे आकडे कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी धोरणाची नितांत गरज असल्याचे डॉ.त्रिवेदी सांगतात. वर्ष-2020 मध्ये, मी Twitter वर आत्महत्या प्रतिबंधक धोरणाची मोहीम चालवली. त्यानंतर या धोरणाच्या मागणीबाबत मध्य प्रदेशचे अर्थमंत्री आणि वैद्यकीय मंत्री यांची भेट घेतली. मुलांच्या अभ्यासक्रमात मानसिक आरोग्याचा समावेश करावा, असे पत्रही मी पंतप्रधान कार्यालयास लिहिले. तिथेही माझे पत्र मंजूर झाले. हळूहळू अनेक मानसोपचारतज्ज्ञ या मोहिमेशी जोडले जात आहेत.
आत्महत्या प्रतिबंधक धोरण तयार करण्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तज्ञांव्यतिरिक्त मानसोपचार तज्ज्ञांचाही मोठा वाटा आहे. डॉ. त्रिवेदी म्हणतात की, एका संशोधनानुसार, भारतात एकीकडे आत्महत्येच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे त्याच वेळेस इतर 200 लोक आत्महत्येच्या विचारात असतात. याच ट्रान्स मध्ये असताना त्या वेळी 15 जणांनी प्रयत्न केले आहेत. म्हणजेच, आत्महत्येची माहिती त्यांना थेट प्रेरणा देत आहे.