AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र

चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात पराभव प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतात, मात्र या पराभवातून तुम्हाला सावरता आलं पाहिजे. तरच तुम्ही भविष्यात यशस्वी व्यक्ती व्हाल. यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुमच्याकडे काही गुण असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti : पराभवातून सावरून विजय कसा मिळवायचा? चाणक्य यांनी सांगितला यशस्वी जीवनाचा मंत्र
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 9:12 PM
Share

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांचा हा प्रवास खूप अवघड होता. या काळात त्यांच्या वाट्यात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी त्यावर मात केली आणि शेवटी विजय मिळवला. चाणक्य यांचा जेव्हा धनानंद सोबत लढा सुरू होता, तेव्हा त्यांच्या वाट्यालाही अनेकदा पराभव आला, मात्र ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यावर मार्ग शोधून काढला. चाणक्य यांना जेव्हा -जेव्हा पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यातून सावरत ते पुढच्या वेळी अधिक ताकदीने धनानंद सोबत लढते. चाणक्य यांना आपल्या आयुष्यात जे -जे काही अनुभव आले, त्या अनुभवाचं सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाचा जय पराजय सुरूच राहतो, परंतु जेव्हा तुमचा पराभव होतो, तेव्हा त्यातून तुम्हाला सावरता आलं पाहिजे, तरच भविष्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पराभवाची कारणं – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा पराभव होतो, तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका, तर पराभवानंतर आपण का हरलो? आपल्याला अपयश का आलं? या कारणांचा शोध घ्या. पराभवातून योग्य तो धडा घ्या आणि पुन्हा कामाला लागा. तुम्हाला भविष्यात नक्की यश मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शत्रूची ताकद ओळखा – चाणक्य म्हणतात तुमचा शत्रू किती बलवान आहे, त्याचा आधी नीट अंदाज घ्या. त्यानतंर तुम्ही तुमची रणनीती ठरवा. तुम्ही तुमच्या शत्रूसोबत कसा लढा देणार आहात? याचं व्यवस्थित नियोजन करा, त्यानंतरच तुम्ही तुमच्या शत्रूवर हल्ला करा. लक्षात ठेवा शत्रूला कधीही सावध होण्याची संधी देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

धैर्य आणि संयम – चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा पराभव होतो, तेव्हा अशावेळी तो लगेच आपलं धैर्य आणि संयम गमावून बसतो. मात्र ती चूक तुम्ही करू नका. जेव्हा पराभव होतो, तेव्हा संयम ठेवा आणि अधिक जोमाने कामाला लागा, यश तुमचंच आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु