AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato Price : टोमॅटोने संसारात लावली ‘आग’, या चुकीमुळे पत्नी लालेलाल, पतीच्या घराला ठोकला रामराम

Tomato Price : टोमॅटाने तर आता अजूनच कहर केला आहे. रोजच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस वैतागला आहे. त्यातच टोमॅटोमुळे आता किचनमध्ये पण भांडणं सुरु झाली आहेत. रागा रागात या पत्नीने तर पतीच्या घराला रामराम ठोकला आहे.

Tomato Price : टोमॅटोने संसारात लावली 'आग', या चुकीमुळे पत्नी लालेलाल, पतीच्या घराला ठोकला रामराम
| Updated on: Jul 13, 2023 | 3:20 PM
Share

नवी दिल्ली : टोमॅटोच्या वाढत्या किंमती (Tomato Price Hike) भारतात आता राष्ट्रीय मुद्दा झाला आहे. केंद्र सरकारची यामुळे झोप उडाली आहे. भाजीपालाचे दर वाढले आहेत. त्यात टोमॅटोने सर्वाधिक चपळता दाखवली. टोमॅटो तर काही ठिकाणी 200 रुपयांचा टप्पा गाठून पुढे पळाले आहे. लाखो लोकांनी टोमॅटो खाणे कमी केले अथवा बंद केले आहे. तर सोन्यासारखी टोमॅटोची खरेदी सुरु आहे. 4-4 किलो टोमॅटो घेणारे आता एक पाववरच समाधान मानत आहे. किंमतीचं सोडा, इथं टोमॅटोमुळे वैवाहिक आयुष्यात वादळं येऊ लागली आहेत. टोमॅटोमुळे संसार उद्धवस्त होत आहेत. हो अगदी, खरंय. टोमॅटोमुळे किचनमध्ये भांडणं लागली आहेत. रागा रागात एका पत्नीने तर पतीचे (Wife Left Home) घरच सोडून दिलं आहे. पतीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आता टोमॅटो अजून काय दिवस पाहायला लावतो काय माहिती?

कुठे घडली घटना ही घटना मध्यप्रदेशात घडली. शहडोल जिल्ह्यातील धनपुरी पोलीस ठाण्यातंतर्गत बेमहौरी नावाचं गाव आहे. येथील संजीव वर्मा हे छोटासा ढाबा चालवितात. तसेच ते टिफिन सर्व्हिस पण चालवितात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आयुष्यात हे मोठं वादळ आलं. त्यांच्या एका कृतीमुळे पत्नी थेट घर सोडून निघून गेली.

काय केली चूक संजीव वर्मा यांनी पत्नीला न विचारता भाजीत तीन टोमॅटो चिरुन टाकले. पत्नीला ही गोष्ट माहिती होताच, ती रागाने लालबुंद झाली. संजीव वर्मा यांच्यावर ती प्रचंड संतापली. तिने रागा रागात लहान मुलीला सोबत घेऊन घर सोडले. तिला थांबविण्याचा संजीव वर्माने आटोकाट प्रयत्न केला. पण पत्नीचा पारा चढलेला होता. संजीवच्या भावना तिच्यापर्यंत पोहचल्याच नाही. तनक्यातच तिनं घर सोडले.

गाठले पोलीस स्टेशन पत्नी रागाच्या भरात निघून गेल्याने संजीव वर्मा आता चिंताग्रस्त झाला आहे. तिने मुलीला पण सोबत नेले. संजीवने पत्नीचा नातेवाईकांकडे शोध घेतला. काहींना संपर्क केला. तिच्या माहेरी चौकशी केली. पण तिचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे संजीवने तातडीने धनपुरी पोलीस ठाणे गाठले आणि पत्नीला शोधण्याची विनंती केली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीची नोंद घेतली आहे. टोमॅटोमुळे पत्नी सोडून गेली, अशी तक्रार पती संजीवने दिली आहे.

काय घेतली शपथ आता एवढं महाभारत या टोमॅटोमुळे घडल्याने संजीवने प्रचंड धसका घेतला आहे. त्याने जीवनात आता कधीच टोमॅटो खाण्याचे सोडा, त्याला हात पण लावणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा घेऊन टाकली.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड