हैदराबाद : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये कारखान्यातून वायू गळती झाल्याने हाहाकार उडाला आहे. आरआर वेंकटपुरम गावात असलेल्या ‘एलजी पॉलिमर्स इंडिया’ कंपनीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रासायनिक वायू गळती झाली. यामध्ये एका चिमुरड्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वृत्त आहे. जवळपास दोनशे नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे. (Visakhapatnam LG Polymers industry Gas leak)
विशाखापट्टणम शहरातील आरआर वेंकटपुरम या गावात एलजी पॉलिमर कंपनीचा केमिकल गॅस प्लांट आहे. या प्लांटजवळील रहिवाश्यांनी डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सुरुवातीला केली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.
Andhra Pradesh: 3 persons, including one child, dead after chemical gas leakage at LG Polymers industry in RR Venkatapuram village, Visakhapatnam. pic.twitter.com/zs4oWuN2KA
— ANI (@ANI) May 7, 2020
दरम्यान, गॅसगळती थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. वायूचा कमाल प्रभाव सुमारे एक ते दीड किमी परिसरात होता, तर वास दोन ते अडीच किमी भागात पसरला होता. 100 ते 120 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवला असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
Andhra Pradesh: 3 persons, including one child, dead after chemical gas leakage at LG Polymers industry in RR Venkatapuram village, Visakhapatnam. pic.twitter.com/zs4oWuN2KA
— ANI (@ANI) May 7, 2020
1961 मध्ये ‘हिंदुस्थान पॉलिमर’ नावाने स्थापना केली गेलेली ही कंपनी दक्षिण कोरियाच्या एलजी केमने ताब्यात घेतली आणि 1997 मध्ये एलजी पॉलिमर्स इंडिया असे नामकरण केले. प्लांटमध्ये पॉलिस्टीरिन बनवले जाते. हे प्लास्टिक खेळण्यांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते. (Visakhapatnam LG Polymers industry Gas leak)