आंध्र प्रदेशला मिळणार नवी राजधानी, अमरावती इतिहास जमा होणार

| Updated on: Jan 31, 2023 | 3:31 PM

23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले.

आंध्र प्रदेशला मिळणार नवी राजधानी, अमरावती इतिहास जमा होणार
वायएस जगन मोहन रेड्डी
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (Jagan Reddy) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी राज्याची राजधानी बदलण्याचा (Andhra Pradesh Capital) निर्णय घेतला आहे. आता अमरावती नाही तर विशाखापट्टणम (Visakhapatnam)ही आंध्रप्रदेशची नवी राजधानी असणार आहे. त्यांनी नव्या राजधानीत ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

सीएम रेड्डी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, ‘मी तुम्हाला विशाखापट्टणमला आमंत्रित करतो. विशाखापट्टणम येत्या काही दिवसांत आमची राजधानी बनणार आहे. येत्या काही महिन्यांतच मी विशाखापट्टणमलाही शिफ्ट होत आहे. ३ आणि ४ मार्चला विशाखापट्टणम येथे या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहोत.

हे सुद्धा वाचा

नऊ वर्षांपुर्वी तेलंगणा

तेलंगणापासून वेगळे झाल्यानंतर 23 एप्रिल 2015 रोजी अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये राज्याच्या तीन राजधानींचे नियोजन करण्यात आले. यामध्ये अमरावती, विशाखापट्टणम आणि कुर्नूल या शहरांचा समावेश आहे. मात्र, नंतर ती मागे घेण्यात आली आणि अमरावती ही राजधानी राहिली.

विशाखापट्टणमचे वैशिष्ट्ये

विशाखापट्टणम आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. विशाखापट्टणम शहर आंध्र प्रदेशच्या ईशान्य भागात पूर्व घाट व बंगालच्या उपसागराच्या मध्ये वसले आहे. हे भारतामधील १७व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. वॉल्टेअर आणि विशाखापट्टणम ही जुळी शहरे आहेत. वॉल्टेअर हे एक रेल्वे जंक्शन आहे. देशातील पाचव्या क्रमांकाच्या वर्दळीचे बंदर विशाखापट्टणम आहे. भारतीय नौसेनेच्या ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय येथे आहे.