पुतिन पुन्हा भारताच्या मदतीला धावले; रशियाची मित्र भारतासाठी सर्वात मोठी घोषणा, त्या एका शब्दाने चिंताच मिटली

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीमध्ये परराष्ट्रमंत्र्यांची ब्रिक्स बैठक होणार आहे. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी रशियाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे भारताचं सर्वात मोठं टेन्शन दूर झालं आहे.

पुतिन पुन्हा भारताच्या मदतीला धावले; रशियाची मित्र भारतासाठी सर्वात मोठी घोषणा, त्या एका शब्दाने चिंताच मिटली
vladimir putin
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 13, 2026 | 5:48 PM

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये संघर्ष अजूनही सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. याचा फटका हा भारताला देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. परंतु आता रशियाकडून भारतासाठी एक मोठी गुड न्यूज आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे दिल्लीमध्ये आयोजित परराष्ट्र मंत्र्यांच्या ब्रिक्स बैठकीत सहभागी होणार आहेत, मात्र त्यापूर्वीच त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यासोबतच भविष्य काळत रशियाचं भारताबाबत परराष्ट्र धोरण कसं असेल? हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नेमकं काय म्हटले सर्गोई

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. भारत आणि रशियामध्ये मजबूत राजनौतिक आणि आर्थिक संबंध आहेत. भविष्य काळात ते आणखी मजबूत होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रशिया भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. रशिया भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा सुरूच ठेवेल त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये खंड पडणार नाही, आम्ही भारतला कच्च तेल कमी पडू देणार नाही, अशी घोषणाही यावेळी सर्गेई लावरोव यांनी केली आहे.

दरम्यान भारत आणि रशियामधील संबंधांबाबत ज्या लोकांना चिंता वाटते, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असंही यावेळी सर्गेई यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी सर्गेई लावरोव यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की, भारताने रशियाकडून तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे, त्याचा भारत आणि रशियामधील संबंधांवर काही परिणाम होईल का? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, त्यामुळे दोन्ही देशाच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण हे भारतामुळे नाही तर अमेरिकेनं अवैध पद्धतीने रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे घडून येत आहे. मी आपल्याला शब्द देतो की, त्याचा कोणताही परिणाम हा भारताला निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलावर होणार नाही, असं सर्गेई यांनी म्हटलं आहे.

Follow Us