AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update: महाराष्ट्रात काय आहे पुढील चार दिवसाचा हवामानाचा अंदाज…

महाराष्ट्रातही गेल्या काही तासांपासून विविध भागात पाऊस सुरु असून पुढील 4 दिवस मात्र जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Rain Update: महाराष्ट्रात काय आहे पुढील चार दिवसाचा हवामानाचा अंदाज...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 09, 2022 | 8:53 AM
Share

नवी दिल्लीः देशाच्या राजधानीत दिल्लीत (Delhi Rain) पुढील काही दिवस पाऊस होणार नसला तरी भारतातील अनेक जिल्ह्यांमधून पुढील 4 दिवस पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्राला मात्र यलो अलर्ट (Maharashtra Yellow Alert ) दिला असून काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पुराचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमधून मुसळधार पाऊस होत आहे. कर्नाटकातील बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) बेंगळुरू शहरभर पाणी साचले होते.  त्यामुळे शहरातून बोटीने जाण्याचा प्रसंग कर्नाटकातील नागरिकांवर आला होता. तर महाराष्ट्रातही गेल्या काही तासांपासून विविध भागात पाऊस सुरु असून पुढील 4 दिवस मात्र जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

देशातील अनेक राज्यांमधून पाऊस होत असला तरी दिल्लीत मात्र तापमान वाढले असून दिल्लीकर पुन्हा एकदा पावसाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या दिल्लीत 27 डिग्रीपासून ते अगदी 37 डिग्रीपर्यंत तापमान राहिले आहे, त्यामुळे दिल्लीत उष्णता वाढली असून दिल्लीकर पाऊस पडण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

दिल्लीत उष्णता वाढली

दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्येही उष्णता वाढली असून पुढील दोन तीन दिवसात काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाण्यासह पुण्यात मुसळधार

महाराष्ट्रात पुढील 4 दिवस पावसामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांतून पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात पुन्हा पुराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुराचा पुन्हा फटका बसणार

पुढील चार दिवस राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार असल्याने पुन्हा पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुरामुळे राज्यातील विविध भागाती नगारिकांचे जीवन विस्कळीत होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हलका आणि मध्यम पाऊस

हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण छत्तीसगड, तेलंगाना,मध्य महाराष्ट्रात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.तर बिहार, झारखंड, दक्षिण गुजरात आणि लक्षद्वीपमध्येही हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या शक्यता आहे.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?