AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू-मुस्लिमांसाठी वेगवेगळं मतदान केंद्र बनवा, भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

"हिंदू वस्तीसाठी आणि हिंदू मतदारासाठी वेगळा पोलिंग बूथ बनवा. हिंदू मतदार मुस्लिम वस्तीतून गेल्यास त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यांना मतदानापासून रोखलं जाऊ शकतं, असं भाजप नेत्याच म्हणणं आहे"

हिंदू-मुस्लिमांसाठी वेगवेगळं मतदान केंद्र बनवा, भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे मागणी
suvendu adhikariImage Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 22, 2025 | 1:03 PM
Share

पश्चिम बंगालमध्ये अलीकडेच वक्फ सुधारणा विधेयकावरुन मोठा हिंसाचार झाला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला एकवर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीने सोमवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे हिंदूंसाठी वेगळा पोलिंग बूथ स्थापन करण्याची मागणी केली. भाजप नेत्याने पश्चिम बंगालमध्ये हिंदू-मुस्लिमांसाठी वेगवेगळं मतदान केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.

भाजप नेते सुवेंधु अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे हिंदूंसाठी वेगळं मतदान केंद्र बनवण्याची मागणी केली. भाजप नेत्याने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळ पोलिंग बूथ उभारण्याची मागणी केली. जिथे 50 टक्क्यापेक्षा कमी हिंदू मतदार आहे, हिंदू वस्तीसाठी आणि हिंदू मतदारासाठी वेगळा पोलिंग बूथ बनवा. हिंदू मतदार मुस्लिम वस्तीतून गेल्यास त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यांना मतदानापासून रोखलं जाऊ शकतं, असं भाजप नेत्याच म्हणणं आहे.

‘हिंदू संकटात आहेत’

सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालमधील भाजपचे मोठे नेते असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ते सोमवारी म्हणाले की, “ममता बॅनर्जी सरकारच्या कुशासनामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदू संकटात आहेत. ते राज्यात अनेक ठिकाणी लोकशाही अधिकाराचा वापर करु शकत नाहीत. मतदान करु शकत नाहीत. जिथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तिथे हिंदू मतदारांना धमकावण्याचे आणि मतदानपासून रोखण्याचे प्रकार समोर आले आहेत.”

‘म्हणून ते हिंदुंना वाचवत नाहीयत’

सुवेंदु अधिकारी यांनी हिंदू अल्पसंख्यांक आहेत, तिथे वेगळं मतदान केंद्र उभारण्याची मागणी केलीच, शिवाय अशा ठिकाणी हे मतदान केंद्र उभारा जिथे हिंदुंना मुस्लिम वस्तीतून जाण्याची गरज पडणार नाही. वक्फ सुधारणआ विधेयकावरुन पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये सांप्रदायिक हिंसाचार झाला. भाजपने यावरुन TMC सरकारवर हल्लाबोल केला. फक्त मुस्लिम मतपेटी कायम ठेवण्यासाठी ते हिंदुंना वाचवत नाहीयत असा आरोप भाजपने केला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.