ओदिशा रेल्वे अपघातानंतर शाळेत जायला का घाबरत आहेत मुलं, काय कारण आहे ?

| Updated on: Jun 08, 2023 | 9:16 PM

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की शाळेच्या काही मोठ्या मुलांनी आणि एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी बचाव कार्यात देखील सहभाग घेतला होता.

ओदिशा रेल्वे अपघातानंतर शाळेत जायला का घाबरत आहेत मुलं, काय कारण आहे ?
Odisha-accident
Image Credit source: socialmedia
Follow us on

बालासोर : ओदिशाच्या बहनगा उच्च विद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या शाळेत जाण्यासाठी घाबरत आहेत. या शाळेत अपघातानंतर सुरुवातीला रेल्वे अपघातातील मृतदेहांना ठेवण्यात आले होते. शुक्रवार दि. 2 जूनच्या सायंकाळी ओदिशा ( Odisha Railway Accident ) येथील बालासोर जिल्ह्यातील ( Balasore Train Accident )  रेल्वेच्या झालेल्या भीषण अपघातात 275 प्रवासी ठार झाले तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर अनेक मृतदेहांची अद्याप ओळखही पटलेली नाही.

ओदिशाचा रेल्वे अपघाताची घटना घडली तेव्हा लागलीच 65 वर्षीय जुन्या असलेल्या या शाळेत मृतदेहांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची भीती वाटत आहे. शाळेच्या व्यवस्थापन समितीने राज्य सरकारला ही इमारत जुनी झाली असल्याने तिला पाडण्याची मागणी सरकारकडे केली आहे. बहनगा उच्च विद्यालयाचे प्रिन्सिपलनी मान्य केले की विद्यार्थी घाबरले आहेत. त्यामुळे शाळेत आम्ही पुजा आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शाळेच्या पुनर्विकासाची मागणी 

शाळेच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की शाळेच्या काही मोठ्या मुलांनी आणि एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी बचाव कार्यात देखील सहभाग घेतला होता. शाळा आणि लोकशिक्षण विभागाच्या निर्देशानंतर शाळेचा दौरा करणारे बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी सांगितले की आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी, प्रिन्सिपल, अन्य कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. ते शाळेच्या जुन्या इमारतीला पाडून तिचा पुनर्विकास करू इच्छीत आहे. म्हणजे मुलांना त्यांच्या वर्गात या कसलीही भिती वाटणार नाही.

मुलांनी टीव्हीवर पाहिले 

शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्याने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की अपघातानंतर स्कूलमध्ये मृतदेहांना ठेवल्याचे विद्यार्थ्यांनी टीव्हीवर पाहीले. त्यामुळे मुले स्वाभाविकपणे घाबरली आहेत. आणि 16 जूनला शाळा सुरु होणार आहे. पण मुले आणि पालक शाळेत येण्यास चाचरत आहेत. वास्तविक अपघातानंतर लागलीच शाळेत ठेवलेले मृतदेह लागलीच हलविले. नंतर शाळेचे वर्ग आणि परिसर साफ करण्यात आला होता. परंतू विद्यार्थी आणि त्यांचे पालक घाबरलेले आहेत.