
मागच्या काही महिन्यांपासून देशाच्या अनेक भागातून छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र आणि ओदिशा येथे नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेऊन आत्मसमर्पण केल्याच्या बातम्या येत आहेत. 26 ऑक्टोंबर रोजी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 21 माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवलं. 17 ऑक्टोंबर रोजी डोक्यावर 9.18 कोटी इनाम असलेला नक्षलवादी सेंट्रल कमिटीचा मेंबर रुपेश ऊर्फ सतीशने आत्मसमर्पण केलं. ऑक्टोंबर महिन्यात 300 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. नक्षलवादी इतक्या मोठ्या संख्येने शस्त्र खाली ठेऊन आत्मसमर्पण करतायत, या मागे काय कारण आहे?. केंद्रातल्या एनडीए सरकारने दावा केलाय की, 31 मार्च 2026 पर्यंत ते नक्षलवाद संपवतील. याच क्रमात देशात नक्षलवाद्यांच्या घडमोडी कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत. छत्तीसगड हे सर्वाधिक नक्षल प्रभावित राज्य आहे. तिथून सतत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याच्या बातम्या येत आहेत. देशात आता नक्षलवाद कमी, कमी होत चाललाय यामागे काय कारण आहे?. नक्षलवादी मुख्य प्रवाहात परतायत, यामागे काय कारण आहे? ...