AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरातची सुटका नाहीच, कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मुलगा हर्षवर्धन याला अटक करण्यात आली असून, शिर्डी फसवणूक प्रकरणात खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे.

भोंदू बाबा अशोक खरातची सुटका नाहीच, कोर्टाचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Ashok Kharat
| Updated on: Apr 01, 2026 | 11:57 AM
Share

राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत आज संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे.

वैद्यकीय तपासणी आणि कारागृहात रवानगी

न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले आहे. तेथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे.

गेल्या १४ दिवसांपासून विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांतही SIT ने खरातची कसून चौकशी केली. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी काल रात्री उशिरा खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात यालाही ताब्यात घेऊन अटक केली आहे. बापाच्या या काळ्या कारनाम्यात मुलाचा नेमका सहभाग किती, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

दुसऱ्या गुन्ह्यात उद्या पुन्हा कोठडीची मागणी?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी अशोक खरातचा मुक्काम कारागृहात जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी दोघेही आरोपी आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस त्याला उद्या पुन्हा अटक दाखवून न्यायालयासमोर हजर करणार आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यांमध्ये तितकीच सहभागी असल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच ती फरार झाली असून पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत.

अनेक मोठे मोठे मासे गळाला लागणार

अशोक खरात हा स्वतःला आध्यात्मिक गुरू भासवून महिलांना देवाचा कोप होण्याची भीती घालत असे. या भीतीचा गैरफायदा घेऊन त्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. एसआयटीकडून खरातच्या मालमत्तेची आणि त्याने जमवलेल्या संपत्तीचीही चौकशी सुरू आहे. आतापर्यंत अशोक खरातला दोन टप्प्यांत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील १८ ते २४ मार्च या पहिल्या टप्प्यात त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली, तर २५ ते २९ मार्च या दुसऱ्या टप्प्यात एसआयटीने त्याच्या आर्थिक व्यवहारांची आणि खंडणीच्या प्रकरणांची सखोल चौकशी केली. या काळात पोलिसांनी खरातच्या आश्रमातून आणि निवासस्थानातून महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. त्यामुळे अशोक खरातप्रकरणी अनेक मोठे मोठे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?
अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक उलगडा; पत्नी कल्पना खरात फरार?.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......