AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaziabad Suicide : गाझियाबादमध्ये आर्थिक विवंचनेतून महिलेची मुलांसह आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ?

मयत महिला मोनिकाचा मोनूसोबत 2010 मध्ये विवाह झाला होता. मोनू मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा. मात्र अडीच महिन्यांपासून तो टीबीच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे आधीच जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यात पतीच्या उपचाराचा खर्च यामुळे घरात पैशांची खूपच चणचण निर्माण झाली होती.

Gaziabad Suicide : गाझियाबादमध्ये आर्थिक विवंचनेतून महिलेची मुलांसह आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ?
महावितरणचा भोंगळ कारभार दोन भावंडांच्या जीवावर बेतलाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 08, 2022 | 6:43 PM
Share

गाझियाबाद : पतीचे आजारपण आणि सततची आर्थिक चणचण यामुळे नैराश्येत असलेल्या महिलेने आपल्या मुलांना विषारी द्रव्य पाजून मग स्वतःही विष (Poison) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची दुर्दैवी घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने कुटुंब प्रमुखाला रोख मदत दिली आहे, तर मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदतीचे आश्वासन दिले आहे. (Woman commits suicide with child in Ghaziabad due to financial crisis)

आर्थिक विवंचनेतून महिलेने उचलले टोकाचे पाऊल

गाझियाबादमध्ये ट्रॉनिका सिटी पोलिस स्टेशनच्या इलायचीपूर गावातील अमन गार्डन कॉलनीमध्ये हे कुटुंब राहते. मयत महिला मोनिकाचा मोनूसोबत 2010 मध्ये विवाह झाला होता. मोनू मोबाईल रिपेअरिंगचे काम करायचा. मात्र अडीच महिन्यांपासून तो टीबीच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे आधीच जेमतेम असलेली आर्थिक परिस्थिती आणि त्यात पतीच्या उपचाराचा खर्च यामुळे घरात पैशांची खूपच चणचण निर्माण झाली होती. या विवंचनेतून मोनिकाने रविवारी दुपारी तिची मुलगी मनाली, साक्षी आणि मुलगा अंश यांना विषारी द्रव्य पाजून स्वतः विष प्राशन केले.

मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मुलींना दाखल करताना आईने विष दिल्याचे सांगितले नाही. दिवसअखेरीस आई आणि मुलाचा घरातच मृत्यू झाला होता, तर दोन्ही मुलींचाही सोमवारी पहाटे जीटीबी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी शनिवारी रात्रीच आई आणि मुलाचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले होते, तर दोन्ही मुलींचे मृतदेह जीटीबीमध्ये पोस्टमॉर्टम करण्यात आले आहेत.

पतीला प्रशासनाकडून आर्थिक मदत

पतीच्या आजारपणामुळे मोनिका नैराश्यात होती. पीडित मोनूला प्रशासनाकडून 10,000 रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे, तर डीएम साहेबांनी रेडक्रॉसच्या वतीने 25,000 रुपयांचा धनादेशही पाठवला आहे. मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी गावप्रमुखाकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत दिली जाईल, असे एसडीएम संतोष कुमार राय यांनी सांगितले. (Woman commits suicide with child in Ghaziabad due to financial crisis)

इतर बातम्या

लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना

बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ट्यूशन चालकाला बेड्या

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.