AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅलो मंत्री साहेब, तुम्ही घरी आहात का?, कुणाला येत आहेत वारंवार फोन?, कोण देतंय त्रास?

मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्याला टेलिकॉम कंपनीने एक जुना मोबाईल नंबर दिला, जो आधी एका मंत्र्याचा होता. आता त्याला मंत्र्याच्या ओळखीमुळे अनेक फोन येत आहेत, सरकारी कामकाजापासून वैयक्तिक समस्यांपर्यंत. याने त्याला मोठी डोकेदुखी निर्माण केली आहे. विद्यार्थ्याने रिचार्ज करणेही बंद केले आहे आणि व्हॉट्सअप डीपीवर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

हॅलो मंत्री साहेब, तुम्ही घरी आहात का?, कुणाला येत आहेत वारंवार फोन?, कोण देतंय त्रास?
हॅलो मंत्री साहेब, तुम्ही घरी आहात का ?Image Credit source: freepik
| Updated on: Jun 30, 2025 | 3:26 PM
Share

मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्याने मोठ्या हौसेने नवीन मोबाईल नंबर घेतला. पण आता हाच नंबर त्याच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. या नंबरवर येणाऱ्या फोनमुळे त्याचं जगणं मुश्किल झालं आहे. त्याचं कारण म्हणजे हा नंबर आधी मध्य प्रदेशातील एका बड्या नेत्याचा आणि विद्यमान मंत्र्याचा होता. मंत्री महोदयाने या नंबरचा वापर बंद केला. त्यामुळे टेलिकॉम कंपनीने हा नंबर या विद्यार्थ्याला दिला. त्यानंतर या विद्यार्थ्याला इतके फोन येऊ लागलेत की विचारता सोय नाही. अनेकजण विविध मागण्या करत आहेत. कुणी आपल्या समस्या सांगत आहेत. तर कुणी फक्त हॅलो, मंत्री महोदय, तुम्ही घरी आहात का? असा सवाल करून भांडावून सोडत आहेत.

भोपाळच्या एका कॉलेजात हा तरुण शिकतोय. त्याने एक मोबाईल खरेदी केला. त्यासोबत नवीन सीमकार्डही त्याने खरेदी केलं. योगायोगाने त्याला जो नंबर मिळाला होत राज्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याचा होता. राज्यातील असंख्य लोक आणि नोकरशहांकडे मंत्री महोदयांचा हा नंबर होता. त्यामुळे या नंबरवर सातत्याने फोन येत आहे. राज्यातील जनता, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि व्हिआयपी कॉलही या नंबरवरून येत आहेत. त्यामुळे हा नंबर माझा आहे. मंत्री महोदयाचा नाही, असं या विद्यार्थ्याला वारंवार सांगावं लागत आहे.

मंत्र्याचा स्टाफ समजतात

मी नंबर घेतल्यापासून अनेक फोन येत आहे. रात्री अपरात्री केव्हाही फोन येत आहेत. काही लोक सरकारी कामे सांगत आहेत. काही लोक नागरी समस्यांची तक्रार करत आहेत. तर काही लोक वैयक्तिक समस्या मांडत आहेत. तर काही लोक भेटण्यासाठी वेळ मागत आहेत. अनेकजण माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवत नाहीये. मंत्र्याचा स्टाफ असल्याचं समजूनच माझ्याशी बोलत असतात, असं या विद्यार्थ्याने सांगितंल.

आधी मजा, नंतर…

सुरुवातीला या विद्यार्थ्याला मोठ्या लोकांशी बोलण्याचं अप्रुप वाटलं. पण नंतर वारंवार फोन येऊ लागल्याने त्याची डोकेदुखी वाढली. तो इतका वैतागला की त्याने फोन रिचार्ज करणंच बंद केलं आहे. त्यामुळे त्याचीही इनकमिंग आणि आऊटगोइंगची सुविधा बंद झाली आहे. दरम्यान, यावर टेलिकॉमच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंबर रिलोकेशनची प्रक्रिया सामान्य आहे. जुने नंबरच ग्राहकांना दिले जातात. पण अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

डीपीवर सूचना

दरम्यान, अनोळखी नंबर येत असल्याने वैतागलेल्या या तरुणाने व्हॉट्सअपवरचा आपला डीपी बदलला आहे. त्यावर हा मंत्र्याचा नंबर नाहीये. कृपया कार्यालयात संपर्क साधून नवीन नंबर घ्यावा, असं त्याने डीपीवर लिहिलं आहे. कॉल्स येऊ नये म्हणून त्याने नंबर रिचार्ज करणंही बंद केलं आहे. तो फक्त वायफायद्वारेच व्हॉट्सअपचा वापर करत आहे.

Follow Us
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...