4 शब्दांमुळे तयार झालं सुपरहिट गाणं, 55 वर्षांपासून चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ, तुम्ही ऐकून…

अवघ्या 25 मिनिटांमध्ये तयार झालेले किशोर कुमार यांचे सुपरहिट गाणे; चार शब्दांतून सुचलेली अजरामर धून. 55 वर्षानंतरही या गाण्याची प्रचंड क्रेझ.

| Updated on: Jul 20, 2026 | 3:05 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम राहिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आन मिलो सजना' या चित्रपटातील 'अच्छा तो हम चलते हैं' हे सदाबहार गाणे. आजही हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते.

बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही लोकप्रियतेच्या शिखरावर कायम राहिली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आन मिलो सजना' या चित्रपटातील 'अच्छा तो हम चलते हैं' हे सदाबहार गाणे. आजही हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाते.

2 / 5
हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विरहाच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्याला संगीतकार लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले, तर गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केले. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.

हे गाणे अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विरहाच्या भावनांना स्पर्श करणाऱ्या या गाण्याला संगीतकार लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले, तर गीतकार आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केले. हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.

3 / 5
या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे. गाण्याच्या चालीवर योग्य शब्द सुचत नसल्याने लक्ष्मीकांत, प्यारेलाल आणि आनंद बक्षी बराच वेळ विचारमंथन करत होते.

या गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा आहे. गाण्याच्या चालीवर योग्य शब्द सुचत नसल्याने लक्ष्मीकांत, प्यारेलाल आणि आनंद बक्षी बराच वेळ विचारमंथन करत होते.

4 / 5
अखेर कंटाळून लक्ष्मीकांत सहज म्हणाले, 'अच्छा तो हम चलते हैं.' त्यावर आनंद बक्षी यांनी विचारले, 'फिर कब मिलोगे?' त्यावर उत्तर आले, 'जब तुम कहोगे.' या चार शब्दांतूनच आनंद बक्षी यांच्या मनात संपूर्ण गाण्याची कल्पना आली.

अखेर कंटाळून लक्ष्मीकांत सहज म्हणाले, 'अच्छा तो हम चलते हैं.' त्यावर आनंद बक्षी यांनी विचारले, 'फिर कब मिलोगे?' त्यावर उत्तर आले, 'जब तुम कहोगे.' या चार शब्दांतूनच आनंद बक्षी यांच्या मनात संपूर्ण गाण्याची कल्पना आली.

5 / 5
त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत यांना थांबवून अवघ्या 25 मिनिटांत संपूर्ण गाणं लिहून पूर्ण केले. विशेष म्हणजे, सहज झालेल्या या संवादातून जन्माला आलेले हे गाणे पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक ठरले.

त्यानंतर त्यांनी लक्ष्मीकांत यांना थांबवून अवघ्या 25 मिनिटांत संपूर्ण गाणं लिहून पूर्ण केले. विशेष म्हणजे, सहज झालेल्या या संवादातून जन्माला आलेले हे गाणे पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर रोमँटिक गाण्यांपैकी एक ठरले.

Follow Us