Shreyas Iyer : T20 टीमचा कॅप्टन बनल्यानंतर मार्ग सोपा नसेल, श्रेयसचा अय्यर समोर असतील ही 3 चॅलेंजेस
Shreyas Iyer : भारताच्या टी20 टीमचा कॅप्टन बनल्यानंतर श्रेयस अय्यरचा मार्ग सोपा नसेल. त्यांच्यासमोर तीन आव्हानं असतील. अजून अधिकृतपणे श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा झालेली नाही. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड होणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या टी20 टीमचं नेतृत्व लवकरच श्रेयस अय्यरच्या हातात येणार आहे. श्रेयसच्या नावावर बीसीसीआयच एकमत झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. (Pankaj Nangia/Getty Images)

सूर्याचा सध्या खराब फॉर्म सुरु आहे, त्याशिवाय वाढत वय. हे दोन फॅक्टर त्याच्या विरोधात जाणारे असल्यामुळे सूर्याच्या जागी श्रेयस अय्यरची टीम इंडियाच्या कॅप्टन पदी निवड होणार आहे. सूर्यकुमार यादवला टीम मधूनही ड्रॉप केलं जाऊ शकतं. श्रेयस अय्यर कॅप्टन बनला तरी त्याच्यासमोर सुद्धा तीन आव्हानं असतील.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी होत आहे. टॉप ऑर्डरमध्ये भारताकडे ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे तीन पर्याय आहेत. वैभव सूर्यवंशीची टीममध्ये निवड झाल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कुठल्या स्थानावर खेळवायचं हे श्रेयस समोरील आव्हान असेल. (IPL/BCCI)

भारताच्या प्रमुख खेळाडूंचा सध्या फॉर्म हरवला आहे. शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचं आयपीएल 2026 मध्ये प्रदर्शन खूप साधारणं होतं. हे खेळाडू वेळीच फॉर्ममध्ये आले नाहीत, तर श्रेयस अय्यर समोरील अडचणी वाढतील.

T20 मध्ये भारतीय संघ बऱ्याच वेळापासून दमदार प्रदर्शन करत आहे. भारताचा 2023 साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी 20 सीरीजमध्ये शेवटचा पराभव झाला होता. त्यानंतर टीम 16 सीरीज खेळली असून फक्त एक सीरीज ड्रॉ झाली. 15 मालिका जिंकल्या. श्रेयसला तो लौकीक टिकवून ठेवावा लागेल. तो रेकॉर्ड बिघडला, तर श्रेयसवर लगेच ठपका पडेल.