Akshay Tritiya 2023 : का साजरी केली जाते अक्षय तृतीया? हे आहेत पाच महत्त्वाचे कारण

हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. हा एक असा दिवस आहे जिथे तुम्हाला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाळण्याची गरज नाही. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. चला जाणून घेऊया त्या 5 मोठ्या कारणांबद्दल ज्यांच्यामुळे हा सण इतका शुभ आहे.

| Updated on: Apr 08, 2023 | 11:44 AM
1 / 5
अक्षय्य तृतीयेला भगवान परशुराम, श्री हरी विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी जन्म घेऊन त्यांनी पृथ्वीला वरदान दिले. भगवान परशुराम अमर असून त्यांची या दिवशी पूजा केली जाते.

अक्षय्य तृतीयेला भगवान परशुराम, श्री हरी विष्णूच्या अवताराचा जन्म झाला. जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी जन्म घेऊन त्यांनी पृथ्वीला वरदान दिले. भगवान परशुराम अमर असून त्यांची या दिवशी पूजा केली जाते.

2 / 5
अक्षय्य तृतीयेलाच माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली. राजा भगीरथने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी शिवाच्या कृपेने गंगा पृथ्वीवर आणली. या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगेत स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो.

अक्षय्य तृतीयेलाच माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर आली. राजा भगीरथने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी शिवाच्या कृपेने गंगा पृथ्वीवर आणली. या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगेत स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो.

3 / 5
अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

4 / 5
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली आहे. या महाभारतात भगवद्गीतेचाही समावेश आहे. म्हणूनच या दिवशी गीतेच्या 18 व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली आहे. या महाभारतात भगवद्गीतेचाही समावेश आहे. म्हणूनच या दिवशी गीतेच्या 18 व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे.

5 / 5
अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांना अक्षयपत्र प्राप्त झाले. त्याचे वैशिष्टय़ असे की त्यात कधीही अन्न संपले नाही. त्यामुळे या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात.

अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांना अक्षयपत्र प्राप्त झाले. त्याचे वैशिष्टय़ असे की त्यात कधीही अन्न संपले नाही. त्यामुळे या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात.