
जर तुम्ही देखील मुंबई दररोजच्या प्रवासाला आणि ट्रॅफिला कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मुंबईपासून फक्त काही तासाच्या अंतरावर एक सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. जिथे थोड्याच प्रमाणात पर्यटक भेट देतात.

हा समुद्रकिनारा एकदम शांत असून तो अलिबागपासून अगदी जवळ आहे. त्याचे नाव आवास किनारा आहे आणि तो प्रचंड लांब देखील आहे.

या समुद्रकिनारी झाडे आणि फक्त लाटांचा आवाज येतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाची वाळू आहे.

या ठिकाणी आलेल्या पर्यटकाला दिवस कसा निघून जातो हे देखील कळत नाही. त्यामुळे तुम्ही देखील या ठिकाणी कुटुंबासह भेट देऊ शकता.