Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे – काय टाळावे ? सात्विक आहार काय असावा ?

आषाढी एकादशीला भाविक उपवास करत असतात.या उपवासाला हलका आहारच करणे योग्य असते. मात्र,हा आहार ऊर्जा देणारा असणे देखील गरजेचे असते.

| Updated on: Jul 24, 2026 | 9:16 PM
1 / 10
पंढरीच्या वारीला दरवर्षी लाखो भाविक पायी जात असतात. अनेकांना जाता येत नाही ते उपवास करुन विठ्ठलाची आराधना करतात. नोकरदार मंडळी उपवास करताना त्यांना शरीरात ऊर्जा देखील सांभाळून ठेवायला लागते. पावसाळ्यात पचन यंत्रणा मंदावलेली असते. तसेच कडक उपवासाने प्रकृतीला त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आहाराची योग्य निवड गरजेची असते.

पंढरीच्या वारीला दरवर्षी लाखो भाविक पायी जात असतात. अनेकांना जाता येत नाही ते उपवास करुन विठ्ठलाची आराधना करतात. नोकरदार मंडळी उपवास करताना त्यांना शरीरात ऊर्जा देखील सांभाळून ठेवायला लागते. पावसाळ्यात पचन यंत्रणा मंदावलेली असते. तसेच कडक उपवासाने प्रकृतीला त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आहाराची योग्य निवड गरजेची असते.

2 / 10
आषाढी एकादशीला फळांचा आहार चांगला असतो. फळं, केळी, पपई तसेच बदाम-अक्रोड सारखे ड्रायफ्रुट्स देखील फायद्याचे असते. त्याने शरीराला ऊर्जा आणि जीवनसत्वे देखील मिळतात.

आषाढी एकादशीला फळांचा आहार चांगला असतो. फळं, केळी, पपई तसेच बदाम-अक्रोड सारखे ड्रायफ्रुट्स देखील फायद्याचे असते. त्याने शरीराला ऊर्जा आणि जीवनसत्वे देखील मिळतात.

3 / 10
 पावसाळ्यात पचन यंत्रणा सुस्थ असल्याने भगर, रताळी पोषक ठरतात. यातील कॉम्प्लेक्स कार्ब्समुळे पोट जास्तकाळ भरलेले राहाते. आणि रक्तातील साखरेची पातळी ढासळत रहात नाही.

पावसाळ्यात पचन यंत्रणा सुस्थ असल्याने भगर, रताळी पोषक ठरतात. यातील कॉम्प्लेक्स कार्ब्समुळे पोट जास्तकाळ भरलेले राहाते. आणि रक्तातील साखरेची पातळी ढासळत रहात नाही.

4 / 10
 आषाढीचा उपवास करताना दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, ताक, लिंबू आणि नारळपाणी प्यावे. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही.

आषाढीचा उपवास करताना दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, ताक, लिंबू आणि नारळपाणी प्यावे. ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होत नाही.

5 / 10
आषाढीला तेलकट पदार्थ साबुदाणा वडा, चिप्स, पापड आदी तळलेले पदार्थांना टाळायला हवे. कारण तळलेले पदार्थ पचायला अत्यंत जड असतात. त्यामुळे पोट फुगी तसेच झोप येऊ शकते.

आषाढीला तेलकट पदार्थ साबुदाणा वडा, चिप्स, पापड आदी तळलेले पदार्थांना टाळायला हवे. कारण तळलेले पदार्थ पचायला अत्यंत जड असतात. त्यामुळे पोट फुगी तसेच झोप येऊ शकते.

6 / 10
साबुदाण्यात स्टार्च जास्त आणि पोषक तत्वे एकदम कमी असतात. त्यामुळे साबुदाणा खिचडी जास्त प्रमाणात खाऊ नका. त्याऐवजी भगरीचा आहारात समावेश करा.

साबुदाण्यात स्टार्च जास्त आणि पोषक तत्वे एकदम कमी असतात. त्यामुळे साबुदाणा खिचडी जास्त प्रमाणात खाऊ नका. त्याऐवजी भगरीचा आहारात समावेश करा.

7 / 10
उपवासाला गोड पदार्थांपासून सावध रहा.जास्त गोड पदार्थांना आहारात स्थान दिल्यास शुगर हाय होण्याचा धोका असतो.

उपवासाला गोड पदार्थांपासून सावध रहा.जास्त गोड पदार्थांना आहारात स्थान दिल्यास शुगर हाय होण्याचा धोका असतो.

8 / 10
आहारात साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा.त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहाण्यास मदत होते.

आहारात साध्या मिठाच्या ऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा.त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहाण्यास मदत होते.

9 / 10
उपवासाला सात्विक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे उकडलेले, वाफवलेले पदार्थ, कमी तेलाचा वापर केलेले पदार्थच खा.

उपवासाला सात्विक पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे उकडलेले, वाफवलेले पदार्थ, कमी तेलाचा वापर केलेले पदार्थच खा.

10 / 10
दिवसभरात एकाच वेळी  जास्त जेवण न करता थोड्या -थोड्या काळाने हलका आहार घेत जावे.त्यामुळे मेटाबॉलिझ्म न मंदावता पोट दिवसभर चांगले राहाते.

दिवसभरात एकाच वेळी जास्त जेवण न करता थोड्या -थोड्या काळाने हलका आहार घेत जावे.त्यामुळे मेटाबॉलिझ्म न मंदावता पोट दिवसभर चांगले राहाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us