
फळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. फळे खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. विशेष म्हणजे दररोज एक फळ खाल्ल्याने तुम्ही कधीही आजारी पडणार नाहीत, असे सांगितले जाते.

बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर फळे खाण्याची सवय असते. फळ आपण कधीही खाऊ शकतो. फळ खाण्याचा असा काही योग्य वेळ कधीच नसतो.

फळ खाल्ल्यानंतर कायम लक्षात ठेवा की, कधीही फळ खाल्ल्यानंतर अजिबात दही खाऊ नका दही आणि फळ एकत्र खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

फळ खाल्ल्यानंतर दही खाल्ल्याने उलटी किंवा पोटदुखीसारखी समस्या निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा डोकेदुखीहीची समस्या होते.

दही किंवा ताकही फळे खाल्ल्यानंतर अजिबात खाऊ नका. शक्यतो आपण नाश्त्यामध्ये फळे खाण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल.