
आता जनावरांमध्ये सुद्धा कॅन्सरचा धोका वाढला आहे. पूर्वी हे प्रमाण नगण्य होते. पण आता हे प्रमाण वाढले आहे. जनावरांमध्ये सुद्धा या गंभीर आजाराचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा शेतकर्यांनी मोठी काळजी घेणे आवश्यक आहे.

प्राण्यांना पण पडतात स्वप्न

बेनाईन ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर असे दोन कर्करोग आहेत. ते शरीरात पसरतात आणि गंभीर दुखापत करतात. त्यात वेळीच, योग्य उपचार केला नाही तर जनावर दगावते.

कर्करोगाची लक्षणे अगोदरच दिसतात. जनावरांचे वजन झटपट कमी होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येते. जनावर अशक्त होते. शरीरावर गाठ येते.

पशुधनाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वेळीच पशवैद्यकीय अधिकाऱ्यांशी, पशू तज्ज्ञांशी संपर्क साधवा. वेळीच उपचार केल्यास फायदा होईल.

जनावर प्लास्टिक खाणार नाही, याची काळजी घ्या. त्यांना उकिरडा वा घाणीच्या ठिकाणी चरण्यास सोडू नका. जनावरांना पोष्टिक आहार द्या. त्यांच्या शिंगाना रंग लावू नका.