
मुंबई महानगरपालिकेनं लोकांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 426 घरांची लॉटरीद्वारे सोडत काढली. ही घरं कमी आणि अत्यंत कमी उत्पन्न गटांसाठी होती. परंतु आता या घरांची लॉटरी जिंकणाऱ्यांनीच फ्लॅट घेण्यास नकार दिला आहे.

या घरांच्या किंमती खूप जास्त असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. डिसेंबर 2025 मध्ये मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण मुंबईत 426 फ्लॅट्ससाठी लॉटरी काढली होती. अर्ज प्रक्रियेनंतर एकूण 373 विजेते घोषित करण्यात आले होते. परंतु त्यापैकी आता 96 विजेत्यांनी त्यांनी लॉटरीद्वारे जिंकलेली घरं रिकामी करून ती महापालिकेला परत केली आहेत.

बीएमसी लॉटरी विजेत्यांनी भांडुप आणि भायखळ्यातील फ्लॅट्स जास्त किंमतीच्या असल्याचं कारण दिलं आहे. नाकारलेले बहुतांश फ्लॅट्स हे भांडुप आणि भायखळा या परिसरातील आहेत. हे फ्लॅट खूप महाग वाटल्याने अनेक विजेत्यांनी माघार घेतल्याचं कारण अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

महापालिका आता हे परत केलेल फ्लॅट्स वेटिंग लिस्टमधील अर्जदारांना देईल. परंतु जर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांनीही घरं घेण्यास नकार दिला तर रिकाम्या फ्लॅट्सची संख्या वाढू शकते.

भायखळा इथं कमी उत्पन्न गटासाठी 300 चौरस फूट घरांची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दर गोरेगाव पश्चिम इथल्या स्वामी विवेकानंद मार्ग, पिरामल नगर इथं कमी उत्पन्न गटासाठी 282 चौरस फूट घरांची किंमत 59.15 दशलक्ष रुपये आहे.