
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. काजोल आणि अजय देवगण यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. काही दिवस डेट केल्यानंतर यांनी लग्न केले.

काजोल आणि अजय देवगण यांच्या नात्यामध्ये दरार निर्माण झाली होती. त्याचदरम्यान अजय देवगण हा कंगना राणावत हिच्यासोबत ‘वन्स अपॉन एक टाइम इन मुंबई’ची शूटिंग करत होता.

हेच नाही तर कंगना राणावत आणि अजय देवगण खूप जवळ आले आणि याची भनक थेट काजोल हिला लागली. यानंतर अजय देवगण याला स्पष्ट बोलताना काजोल दिसली.

काजोल हिने अजय देवगणला जे काही सुरू आहे ते थांबवण्यास सांगितले. जर असे नाही झाले तर आपण मुलांना घेऊन घर सोडून जाणार असल्याचे तिने सांगितले.

काजोल ही तिथेच नाही थांबली तर तिने थेट कंगना राणावतला दम ते म्हटले की, जे सुरू झाले ते बंद झाले नाही तर वाईट गोष्टींना सामोरे जावे लागेल. यानंतर अजय देवगण आणि कंगना एकमेकांपासून दूर गेल्याचे सांगितले जाते.