
आजकाल विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे एक महिला लग्न झालेल्या पुरुषासोबत राहू शकते का? असे नेहमी विचारले जात. तसेच त्या महिलेला संबंधित पुरुषाच्या पत्नीचा अधिकार मिळतो का? असेही विचारले जाते. याच पार्श्वभूमीवर भारतातील कायदा काय सांगतो? ते जाणून घेऊ या...

भारतीय कायद्याअंतर्गत विशेषत: हिंदू विवाह अधिनियमाअंतर्गत एक लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे गुन्हा आहे. म्हणजेच लग्न झालेल्या पुरुषासोबत महिला राहात असेल तर तिला पत्नी म्हणून मान्यता मिळत नाही.

संबंधित पुरुष विवाहित आहे, हे माहीत असूनही एखादी महिला त्याच्यासोबत राहात असेल तर तिला घरगुती हिंसाचार अधिनियम 2000 अंतर्गत पालन पोषणाची मागणी करता येत नाही. जानेवारी 2026 मध्ये मुंबई उच्च तसे स्पष्ट केलेले आहे.

समाजात विवाहबाह्य संबंधांना अनैतिक मानले जाते. परंतु कायद्याच्या भाषेत जोपर्यंत एखाद्या कायद्याचे उल्लंघन होत नाही, तोपर्यंत तो गुन्हा नसतो. अशा प्रकारच्या एखाद्या नात्यात महिलेला पत्नी म्हणून दर्जा मिळात नसला तरीही एकत्र राहात असलेल्या महिला आणि पुरुषाच्या मुलाला मात्र पुरुषाच्या संपत्तीवर हक्क सांगता येतो.

महिला किंवा पुरुषाचे अगोदर लग्न झालेले असतानाही लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या किंवा अनैकित संबंध असणाऱ्या पुरुष आणि स्त्रीने दुसरे लग्न केले तर भारतात तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात संबंधित पुरुषाची पहिली पत्नी कायदेशीर कारवाई करू शकते. पोटगी तसेच कायद्यात अंतर्भूत असलेल्या नियमानुसार भरपाईची मागणी करू शकते.