
चाणक्य नीतीनुसार, आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात की, आपला स्वाभिमान प्रचंड दुखावतो. मात्र,य या परिस्थितीचा सामना करणे हे विष पिण्यासारखे असते. ही परिस्थिती आपण व्यवस्थित हाताळणे अत्यंत महत्वाचे असते.

काही लोकांना अशी सवय असते की ते वारंवार इतरांचा अपमान करत राहतात. अपमान सहन करणे हे विषासारखे आहे. तुम्ही एकदा सहन करू शकता, पण प्रत्येक वेळी सहन करणे, कोणालाही शक्य होत नाही.

चाणक्य सांगतात की, आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की, चुकीमुळे माणसाला अपमानित व्हावे लागते. पण कोणताच दोष नसताना स्वाभिमानाशी तडजोड अजिबात करू नका.

जर कोणी तुमचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अजिबात सहन करू नका. ही परिस्थिती तुम्हाला मनातून दुःखी करू शकते. यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.

माणसांच्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात की ती जखम बनून मनात घर करून जाते. मात्र, जास्त या गोष्टींचा विचार करून नेहमी दुखी राहणे देखील आरोग्यासाठी चांगले नाहीयं.