त्यानं 1 टन कांदा विकला, मिळाले शून्य रुपये; व्यापाऱ्यानेच वसूल केला 1 रुपया; शेतकरी आयुष्यातून उठला!

छत्रपती संभाजीनगरात एका शेतकऱ्यासोबत संतापजनक प्रकार घडला आहे. या शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकला. परंतु त्याला एकही रुपया भेटला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आहे. हा शेतकरी आता हवालदिल झाला आहे.

| Updated on: May 08, 2026 | 7:24 PM
1 / 6
सध्या कांदा या पिकाचा भाव प्रचंड प्रमाणात पडला आहे. भाव पडल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतात काबाडकष्ट करून लागलेला खर्चदेखील भरून निघत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. या परिस्थितीमुळे शेतकरी अगदी रडवेला झाला आहे.

सध्या कांदा या पिकाचा भाव प्रचंड प्रमाणात पडला आहे. भाव पडल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतात काबाडकष्ट करून लागलेला खर्चदेखील भरून निघत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय. या परिस्थितीमुळे शेतकरी अगदी रडवेला झाला आहे.

2 / 6
छत्रपती संभाजीनगरात तर एक विचित्र आणि संतापजनक प्रकार घडला आहे. शेतकऱ्याने एक तब्बल एक टन कांदा विकला तरीदेखील त्याच्या खिशात एकही रुपया आला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आहे.

छत्रपती संभाजीनगरात तर एक विचित्र आणि संतापजनक प्रकार घडला आहे. शेतकऱ्याने एक तब्बल एक टन कांदा विकला तरीदेखील त्याच्या खिशात एकही रुपया आला नाही. उलट त्यालाच खिशातून व्यापाऱ्याला एक रुपया द्यावा लागला आहे.

3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरातील एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याला 1 टन 2 क्विंटल 62 किलो कांदा विकला. या कांदा विक्रीतून शेतकऱ्याला फक्त 1 हजार 262 रुपये मिळाले. या शेतकऱ्याकडून व्यापाऱ्या तोलाई, हमाली, भराईचा भाडे लावले.

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरातील एका शेतकऱ्याने व्यापाऱ्याला 1 टन 2 क्विंटल 62 किलो कांदा विकला. या कांदा विक्रीतून शेतकऱ्याला फक्त 1 हजार 262 रुपये मिळाले. या शेतकऱ्याकडून व्यापाऱ्या तोलाई, हमाली, भराईचा भाडे लावले.

4 / 6
तोलाई, भराई, हमाली याचा एकूण 1 हजार 263 रुपये खर्च शेतकऱ्याच्या माथी मारण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकूनही त्याच्या खिशात तर एकही रुपया आला नाही. उलट त्याच शेतकऱ्याला खिशातून व्यापाऱ्याला एख रुपया द्यावा लागला.

तोलाई, भराई, हमाली याचा एकूण 1 हजार 263 रुपये खर्च शेतकऱ्याच्या माथी मारण्यात आला. त्यामुळे या शेतकऱ्याने तब्बल एक टन कांदा विकूनही त्याच्या खिशात तर एकही रुपया आला नाही. उलट त्याच शेतकऱ्याला खिशातून व्यापाऱ्याला एख रुपया द्यावा लागला.

5 / 6
लागवड खर्चही न निघाल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. मी मुलीच्या लग्नाला चार ते पाच लाख रुपये कर्ज काढले होते. आता ते कसे फेडू असा प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला असून सरकारकडून अनुदानाची अपेक्षा केली आहे.

लागवड खर्चही न निघाल्याने हा शेतकरी हवालदिल झाला आहे. मी मुलीच्या लग्नाला चार ते पाच लाख रुपये कर्ज काढले होते. आता ते कसे फेडू असा प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला असून सरकारकडून अनुदानाची अपेक्षा केली आहे.

6 / 6
या शेतकऱ्याने एकूण चार एकर शेतीवर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्याला अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च आला होता.

या शेतकऱ्याने एकूण चार एकर शेतीवर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी त्याला अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च आला होता.

Follow Us