Aai Kuthe Kay Karte | आशुतोषने वाचवला यश जीव, अरुंधतीलाही गाण्याची ऑफर, ऋणानुबंध जुळणार का?

| Updated on: Nov 16, 2021 | 12:36 PM

यशचा जीव वाचवणं आणि अरुंधतीला गाण्याची ऑफर देणं यामुळे आता अरुंधतीचे नव्या मित्राशी ऋणानुबंध जुळणार का?, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

1 / 5
छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

2 / 5
अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करत आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करत आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

3 / 5
मालिकेत यश देखील लंडनवरून परतला आहे. मात्र, यश मालिकेत परतल्यावर आता गौरी काहीकाळासाठी बाहेर गेली आहे. यानंतर यश गौरीवर रागवला आहे. रस्त्यावर वाद घालत चालत असताना यश एका गाडीच्यासमोर येतो. त्यावेळी नेमका तिथे उपस्थित असलेला आशुतोष यशचा जीव वाचवतो.

मालिकेत यश देखील लंडनवरून परतला आहे. मात्र, यश मालिकेत परतल्यावर आता गौरी काहीकाळासाठी बाहेर गेली आहे. यानंतर यश गौरीवर रागवला आहे. रस्त्यावर वाद घालत चालत असताना यश एका गाडीच्यासमोर येतो. त्यावेळी नेमका तिथे उपस्थित असलेला आशुतोष यशचा जीव वाचवतो.

4 / 5
यानंतर आशुतोष यशला त्याच्या घरी आणून सोडतो. तेव्हा संजना त्याला घरी येऊन चहा घेण्याचा आग्रह करते. यावेळी तो अरुंधतीला त्याच्या नव्या म्युझिक अल्बममध्ये गाण्याची ऑफर देतो. अरुंधतीला दिलेली ही ऑफर ऐकताच संजनाने तिचा पाण उतारा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, नेमक्यावेळी आशुतोषने मध्ये पडत त्यांची बोलती बंद करतो.

यानंतर आशुतोष यशला त्याच्या घरी आणून सोडतो. तेव्हा संजना त्याला घरी येऊन चहा घेण्याचा आग्रह करते. यावेळी तो अरुंधतीला त्याच्या नव्या म्युझिक अल्बममध्ये गाण्याची ऑफर देतो. अरुंधतीला दिलेली ही ऑफर ऐकताच संजनाने तिचा पाण उतारा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, नेमक्यावेळी आशुतोषने मध्ये पडत त्यांची बोलती बंद करतो.

5 / 5
यशचा जीव वाचवणं आणि अरुंधतीला गाण्याची ऑफर देणं यामुळे आता अरुंधतीचे नव्या मित्राशी ऋणानुबंध जुळणार का?, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

यशचा जीव वाचवणं आणि अरुंधतीला गाण्याची ऑफर देणं यामुळे आता अरुंधतीचे नव्या मित्राशी ऋणानुबंध जुळणार का?, याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.