Year Ender 2021 | आमिर खान-किरण राव ते समंथा-नागा चैतन्य, मनोरंजन विश्वातील ‘या’ जोड्यांनी घेतली फारकत!

बॉलिवूड इंडस्ट्रीत या वर्षात चांगलीच खळबळ उडाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त, कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले. अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली, तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेमाला सुरुवात केली. मात्र, या वर्षी बरेच ब्रेकअप आणि घटस्फोटही झाले. बॉलिवूड आणि टीव्हीची अनेक आवडती जोडपी यावर्षी विभक्त झाली, ज्यामुळे चाहते देखील खूप दुःखी झाले.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 27, 2021 | 12:28 PM
1 / 6
बॉलिवूड इंडस्ट्रीत या वर्षात चांगलीच खळबळ उडाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त, कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले. अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली, तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेमाला सुरुवात केली. मात्र, या वर्षी बरेच ब्रेकअप आणि घटस्फोटही झाले. बॉलिवूड आणि टीव्हीची अनेक आवडती जोडपी यावर्षी विभक्त झाली, ज्यामुळे चाहते देखील खूप दुःखी झाले.

बॉलिवूड इंडस्ट्रीत या वर्षात चांगलीच खळबळ उडाली होती. चित्रपटांव्यतिरिक्त, कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले. अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली, तर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेमाला सुरुवात केली. मात्र, या वर्षी बरेच ब्रेकअप आणि घटस्फोटही झाले. बॉलिवूड आणि टीव्हीची अनेक आवडती जोडपी यावर्षी विभक्त झाली, ज्यामुळे चाहते देखील खूप दुःखी झाले.

2 / 6

आमिर खान आणि किरण राव : आमिर खान आणि किरण राव यांनी या वर्षी त्यांचे 15 वर्षे जुने नाते संपुष्टात आणले. दोघांनी मिळून एक निवेदन जारी करून सांगितले की, दोघेही आता पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाहीत. पण दोघांची मैत्री सदैव अबाधित राहील आणि त्याच वेळी दोघेही आपल्या मुलाला एकत्र वाढवतील.

3 / 6

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य : दक्षिण इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपे समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी या वर्षी ऑक्टोबरमध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून चर्चेत होत्या, परंतु त्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आणि आता दोघांचे नाते संपत असल्याची पुष्टी केली.

4 / 6

कीर्ती कुल्हारी आणि साहिल सहगल : कीर्ती कुल्हारीनेही यावर्षी साहिल सहगलसोबत वेगळे होण्याची घोषणा केली. कीर्तीने सांगितले होते की, दोघेही परस्पर संमतीने वेगळे होत आहेत. हे सर्व त्यांच्यासाठी सोपे नव्हते, पण ते करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

5 / 6

करण मेहरा आणि निशा रावल : करण मेहरा आणि निशा रावल हे टीव्हीवरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले होते, मात्र या वर्षी हे लग्न तुटले आहे. निशाने करणवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला होता.

6 / 6

नुसरत जहाँ आणि निखिल जैन : TMC खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँने 2019 मध्ये निखील जैनशी लग्न केले. दोघांचे लग्न खूप वादात सापडले होते, त्यानंतर दोघेही यावर्षी वेगळे झाले. नुसरतने सांगितले की, दोघांचे लग्न भारतात नोंदणीकृत नव्हते, त्यामुळे त्यांचे लग्न भारतात वैध नाही. इतकेच नाही तर नुसरतने निखिलसोबतचे तिचे नाते लिव्ह इन रिलेशनशिप असल्याचे म्हटले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us