
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान स्टारर 'केदारनाथ' सिनेमाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. 'केदारनाथ' सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर कायम सुशांत सिंग राजपूत याच्याबद्दल बोलताना दिसतात. आता देखील त्यांनी सुशांत आणि सारा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिषेक म्हणाले, 'मला ती संध्याकाळ आजही आठवत आहे. जेव्हा आम्ही केदारनाथ सिनेमाची शुटिंग करत होतो. पावसातील सीन होता आणि प्रचंड थंडी होती. सारा - सुंशात यांनी सीन पूर्ण करायचाच होता. दोघांनी थंडी आणि पावसात सीन शूट केला. तेव्हा सुशांत पूर्णपणे निळा पडला होता..'

सिनेमात सुशांत याला फक्त वजन उचलायचं नव्हतं तर, थंडी आणि पाण्यात सीन देखील शूट करायचे होते. तेव्हा कोणतंही कारण न देता सुशांत याने सिनेमाचं शूट पूर्ण केलं.

'केदारनाथ' सिनेमाला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज देखील सारा कायम केदारनाथ याठिकाणी जात असते. सोशल मीडियावर सारा कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

'केदारनाथ' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फार कमाई केली नाही, पण सिनेमातील गाणि आणि सिनेमातील सारा - सुशांत यांची केमिस्ट्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. सुशांत आणि सारा यांचे जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.