घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय बच्चनने लग्न आणि कौटुंबिक आयुष्याबाबत केले मोठे वक्तव्य

Aishwarya Rai on family life : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यात सध्या घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोघांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघेही आता एकत्र राहत नसल्याचं देखील समोर आले आहे. पण या दरम्यान ऐश्वर्याने कुटुंब आणि विवाहित जीवन याबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

shailesh musale | Updated on: Aug 27, 2024 | 7:27 PM
1 / 5
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील संबंध सध्या बिघडले गेल्याची चर्चा आहे. दोघांचा घटस्फोट होणार असल्याची देखील चर्चा होत आहे. पण दोघांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ऐश्वर्या राय ही गेल्या काही महिन्यांपासून बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याचं देखील समोर आले होते.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यातील संबंध सध्या बिघडले गेल्याची चर्चा आहे. दोघांचा घटस्फोट होणार असल्याची देखील चर्चा होत आहे. पण दोघांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ऐश्वर्या राय ही गेल्या काही महिन्यांपासून बच्चन कुटुंबासोबत राहत नसल्याचं देखील समोर आले होते.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या गुरु सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या गुरु सिनेमाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

3 / 5
सध्या त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली असून त्यांना आराध्या नावाची मुलगी देखील आहे. लग्नानंतर ऐश्वर्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला. पण तिची कारकीर्द संपल्याचे बोलले जात असताना तिने पुन्हा दमदार कमबॅक केले होते. मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वनमध्ये ऐशने दमदार भूमिका साकारली होती आणि या चित्रपटात तिचे नाव नंदिनी होते. याशिवाय ए दिल है मुश्किल या चित्रपटातही तिने काम केले.

सध्या त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली असून त्यांना आराध्या नावाची मुलगी देखील आहे. लग्नानंतर ऐश्वर्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला. पण तिची कारकीर्द संपल्याचे बोलले जात असताना तिने पुन्हा दमदार कमबॅक केले होते. मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वनमध्ये ऐशने दमदार भूमिका साकारली होती आणि या चित्रपटात तिचे नाव नंदिनी होते. याशिवाय ए दिल है मुश्किल या चित्रपटातही तिने काम केले.

4 / 5
लग्नानंतरही ऐश्वर्याने तिला मुलगी होईपर्यंत चित्रपटात काम करत राहिली. यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून वेगळी झाली. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायने लग्न, कुटुंब आणि मुलांबाबत वक्तव्य केले होते. अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिच्या करिअरमध्ये घरगुती आनंदाला प्राधान्य दिले जाईल का? तेव्हा ऐश म्हणाली होती की ती बाळाची वाट पाहत आहे. याशिवाय 'ती लग्न आणि कौटुंबिक जीवन सोडणार नाही'.

लग्नानंतरही ऐश्वर्याने तिला मुलगी होईपर्यंत चित्रपटात काम करत राहिली. यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून वेगळी झाली. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायने लग्न, कुटुंब आणि मुलांबाबत वक्तव्य केले होते. अभिनेत्रीला विचारण्यात आले की तिच्या करिअरमध्ये घरगुती आनंदाला प्राधान्य दिले जाईल का? तेव्हा ऐश म्हणाली होती की ती बाळाची वाट पाहत आहे. याशिवाय 'ती लग्न आणि कौटुंबिक जीवन सोडणार नाही'.

5 / 5
गेल्या काही काळापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या सोबत राहत नसल्याचं बोललं जातंय. आता काही दिवसापूर्वी अनंत अंबानींच्या लग्नात देखील ते वेगवेगळे आले होते. अभिषेक त्याच्या आई-वडिलांसोबत दिसला होता. तर ऐश्वर्या राय बच्चन आपल्या मुलीसोबत दिसली होती.

गेल्या काही काळापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या सोबत राहत नसल्याचं बोललं जातंय. आता काही दिवसापूर्वी अनंत अंबानींच्या लग्नात देखील ते वेगवेगळे आले होते. अभिषेक त्याच्या आई-वडिलांसोबत दिसला होता. तर ऐश्वर्या राय बच्चन आपल्या मुलीसोबत दिसली होती.

Follow Us