
सायरस मिस्त्री यांची ओळख एक यशस्वी उद्योगपती अशी होती. त्यांचा जन्म 4 जुलै 1968 साली झाला होता. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांना टाटा समूहाचे अध्यक्षपद देण्यात आले होते.

24 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांना या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले होते. ते टाटा समुहाचे सहावे अध्यक्ष होते. त्यानंतर हा वाद कोर्टातही गेला होता. भारतात आणि इंग्लंडमध्येही सर्वाधिक महत्त्वाचे उद्योगपती अशा पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

सायरस मिस्त्री यांनी मुंबईच्या एंड जॉन काकन हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.

लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली होती. मिस्त्री यांच्याकडे भारत आणि आयरिश असे दुहेरी नागरिकत्व होते. त्याचा पालघर येथे अपघाती मृत्यू झाला.

प्रसिद्ध उद्योगपती पालनजी मिस्त्री आणि पैटसी पेरीन यांचे ते सर्वात लहान पुत्र होते. वकील इकबाल छागला यांची मुलगी रोहिका छागला यांच्याशी सायरस यांचा विवाह झाला होता.